सायक्लेथॅानचा माध्यमातून आरोग्याचा जागर

जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त जागरुकता पसरवण्यासाठी खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्सचा उपक्रम


१० किमी सायक्लोथॉनमध्ये १०० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग


नवी मुंबई(प्रतिनिधी): मूत्रपिॅडाच्या (किडनी) आजाराने प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिस होत असलेल्या किंवा प्रत्यारोपणाची नितांत गरज असलेल्या लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी मूत्रपिंडाच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. जागतिक किडनी दिनानिमित्त आणि किडनीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी, मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघर यांनीnav 10 किमी सायक्लोथॉनचे आयोजन केले होते ज्यामध्ये 100 हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते आणि मेडिकवर हॉस्पिटल-सेंट्रल पार्क-मेडिकवर हॉस्पिटल या मार्गावर ही सायक्लोथॉन पार पडली. डॉ. माताप्रसाद बी गुप्ता, (मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील केंद्र प्रमुख)आणि पेडल्स फोर कॉज फाऊंडेशनचे संस्थापक श्री साईप्रसाद शेळके यांनी कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवला.

सर्व वयोगटातील लोकांमध्ये मूत्रपिंडाच्या समस्यांचे वाढते प्रमाण हे देशातील चिंतेचे कारण ठरत आहे. तरुणांमध्येही किडनीशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. चूकीच्या आहाराची निवड, उच्च रक्तदाब, मधुमेह, बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणाचे वाढते प्रमाण यासारखे घटक या चिंताजनक प्रवृत्तीला कारणीभूत आहेत. परिणामी, एकूण आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर किडनीच्या समस्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी वेळीच निदान आणि प्रतिबंध करणे गरजेचे आहे. किडनीचे आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वच वयोगटातील लोकांना लक्ष्य करणाऱ्या जागरुकता मोहिमा आणि शैक्षणिक उपक्रमांची गरज अधोरेखित करते. त्यामुळे मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघरने किडनीच्या आजाराशी लढा देण्यासाठी एका अनोख्या सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.

डॉ. विकास भिसे(कन्सल्टंट युरोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) सांगतात की, मूत्रपिंडाचा आजार रोखणे हे केवळ वैयक्तिक आरोग्यासाठीच नाही तर संपूर्ण आरोग्य सेवा प्रणालीसाठी महत्त्वाचे ठरते. ही मूक महामारी प्रगत अवस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत अनेकदा लक्षात येत नाही, ज्यामुळे डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपणाची गरज भासते. नियमित तपासणीद्वारे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्याने या आजारावर मात करता येऊ शकते. किडनीच्या आजाराचा मधुमेह, उच्चरक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या इतर जुनाट आजारांशी जवळचा संबंध आहे. लठ्ठपणा, धूम्रपान आणि अल्कोहोल यासारख्या जोखीम घटकांना संबोधित करून एखादी व्यक्ती केवळ त्यांच्या मूत्रपिंडांचे संरक्षण करू शकत नाही तर या परस्परसंबंधित आरोग्य समस्या विकसित होण्याची शक्यता देखील कमी करू शकतात. या सायक्लोथॉनमध्ये लोकांना त्यांच्या किडनीच्या आरोग्याला प्राधान्य देण्याबाबत जागरुक करण्यात आले. याठिकाणी सहभागींना फिजिओथेरपी सत्र आणि सहभाग प्रमाणपत्रासह किडनीच्या आरोग्यासंबंधी काही महत्त्वाच्या टिप्स देखील दिल्या. प्रत्येकाने आपल्या किडनीची अत्यंत काळजी घेण्याचे आणि निरोगी जीवन जगण्याचे वचन देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


डॉ. माताप्रसाद बी.गुप्ता सांगतात की, ही सायक्लोथॉन सर्वांसाठी आरोग्यदायी चळवळ ठरली आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही इतरांना त्यांच्या किडनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि किडनीच्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यासाठी प्रेरित करू अशी आशा करतो. आपल्या मूत्रपिंडाची काळजी घेण्याचा मोलाचा संदेश तसेच एक निरोगी समाज निर्माण करण्याचा सामूहिक प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा