ISRO Chandrayaan-3 : अभिमानास्पद! चांद्रयान-३ मोहिमेला जाहीर झाला 'हा' मोठा पुरस्कार

इस्रोने भारताची मान आणखी उंचावली!


मुंबई : २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक घटना घडली, ती म्हणजे भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोची (ISRO) चांद्रयान-३ मोहिम (Chandrayaan-3 Mission) यशस्वी झाली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ (South pole) उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीमुळे जगभरातून भारताचे कौतुक करण्यात आले. यानंतर आता इस्रोने भारताची मान उंचावेल अशी आणखी एक कामगिरी केली आहे.


इस्रोच्या चांद्रयान मोहिमेने अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 'एव्हिएशन वीक लॉरेट्स पुरस्कार' (Aviation Week Laureates Award) पटकावला आहे. 'चांद्रयान-३' मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्रोला देण्यात आला. "इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ (S. Somanath) यांनी चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशातून पुढे जात, चांद्रयान-३ मोहिम यशस्वी केली. या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आणि रोव्हर चालवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा हा पहिला देश ठरला." असं अधिकृत अवॉर्ड घोषणेत म्हटलं होतं.





यात पुढे म्हटलं आहे, "अवघ्या ७५ मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केलं. तसंच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली. ही खरंच मोठी कामगिरी आहे." इस्रोच्या वतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Comments
Add Comment

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या

Historical discovery in Denmark : वायकिंग काळातील भव्य वस्त्र उत्पादन केंद्र; हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश

Aarhus, Denmark : पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला आहे. जटलँड

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारमध्ये १०५ पदांसाठी थेट भरती; कधी पर्यंत कराल अर्ज?

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये (Central Government) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. युनियन पब्लिक

TET Paper Leak : ऐनवेळी टीईटीची परीक्षा रद्द! 'नीट' पाठोपाठ आता 'टीईटी' परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण! जाणून घ्या...

पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६