ISRO Chandrayaan-3 : अभिमानास्पद! चांद्रयान-३ मोहिमेला जाहीर झाला 'हा' मोठा पुरस्कार

इस्रोने भारताची मान आणखी उंचावली!


मुंबई : २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक घटना घडली, ती म्हणजे भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोची (ISRO) चांद्रयान-३ मोहिम (Chandrayaan-3 Mission) यशस्वी झाली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ (South pole) उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीमुळे जगभरातून भारताचे कौतुक करण्यात आले. यानंतर आता इस्रोने भारताची मान उंचावेल अशी आणखी एक कामगिरी केली आहे.


इस्रोच्या चांद्रयान मोहिमेने अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 'एव्हिएशन वीक लॉरेट्स पुरस्कार' (Aviation Week Laureates Award) पटकावला आहे. 'चांद्रयान-३' मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्रोला देण्यात आला. "इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ (S. Somanath) यांनी चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशातून पुढे जात, चांद्रयान-३ मोहिम यशस्वी केली. या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आणि रोव्हर चालवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा हा पहिला देश ठरला." असं अधिकृत अवॉर्ड घोषणेत म्हटलं होतं.





यात पुढे म्हटलं आहे, "अवघ्या ७५ मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केलं. तसंच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली. ही खरंच मोठी कामगिरी आहे." इस्रोच्या वतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने