Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला!' संतोष बांगरांची सणसणीत टीका

'माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान' म्हणत संजय राऊतांवरही केली खोचक टीका


संजय राऊत आणि अंबादास दानवे यांचा केला 'लाळचाटे' असा उल्लेख


हिंगोली : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगेच हिंगोली (Hingoli) दौरा केला. यावेळी त्यांनी शिवेसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर टीका केली. पोलिसांच्या धाडी पडल्यावर संतोष बांगर माझ्याकडे यायचा असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला असं म्हणत बांगर यांनी ठाकरेंवर सणसणीत टीका केली आहे. यासोबतच त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व अंबादास दानवे यांच्यावर देखील टीका केली आहे.


आमदार संतोष बांगर म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली होती, मात्र, तीच शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. त्यांच्या पक्षात असतांना संतोष बांगर सारखा ढाण्या वाघ पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणायचे. सर्व जिल्हाप्रमुखांमध्ये नंबर एकचा कोणी जिल्हाप्रमुख असेल तर हिंगोलीचा संतोष बांगर असल्याचे म्हणायचे. दंगल झाल्यावर अन्याय होऊ नये म्हणून संतोष बांगर जायचा आणि त्याला मातोश्रीवर बोलावून प्रशंसा केली जायची. काल मी मुंबईत असतांना एक म्हातारी भेटली आणि मी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत असल्याचे तिला महित झाल्याने तिने माझी पाठ थोपटली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला, यामुळे अक्षरशः वेदना होतात," असे बांगर म्हणाले.



उद्धव ठाकरेंचे सर्व चेलेचपाटे खंडण्या बहाद्दूर


पुढे बांगर म्हणाले की, “आम्ही काम करून जमीन भुसभुशीत केली, पण काळाच्या सभा पाहता काय परिस्थिती झाली. २०१९ मध्ये मला उमेदवारी मिळाली त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सभेला किती जनसमुदाय होता. पण, कालच्या सभेला काय परिस्थिती होती, सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यासाठी सक्षम नेतृत्व लागते आणि माणूस देखील तसा लागतो. मात्र, उद्धव ठाकरेंनी जे काही चेलेचपाटे जमा केले ते सर्व खंडण्या बहाद्दूर असल्याच" बांगर म्हणाले.



माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान


दरम्यान, याचवेळी संतोष बांगर यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सुद्धा टीका केली. 'माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान' असं म्हणत बांगर यांनी टीका केली. संजय राऊत यांनी पक्षाची राखरांगोळी करून टाकली आहे. आपण या मूर्ख लोकांसोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांना समजत कसं नाही? याच मूर्ख लोकांच्या नादी लागून ठाकरेंनी पक्षाचा सत्यानाश करून टाकला. संजय राऊत आणि अंबादास दानवे (Ambadas Danave) लाळचाटे लोकं आहेत. या लोकांच्या नादी लागू नये, कारण अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी सरळसरळ भाजपच्या सोबत यायला पाहिजे" असंही बांगर म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

Jalna Bribe Case : पार्टी सुरू व्हायच्या आधीच वाजले बारा! एसीबीने जालनाच्या तहसीलदारांच्या घरात टाकला छापा

जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक

Chitra Wagh : डहाणूतील संतापजनक प्रकरणावर चित्रा वाघ आक्रमक; दोन बहिणींवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडलेल्या एका लव्ह जिहादच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या

Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणात नवा दावा; निदा खानने केला 'त्या' घटनेचा खुलासा

नाशिक : नाशिकमधील एका आयटी कंपनीशी संबंधित कथित लैंगिक छळ (sexual harassment) आणि धर्मांतर प्रकरणाचा (Religious conversion) तपास सुरू

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न