वंचितच्या निर्णयावर महाविकास आघाडीचे जागावाटप अवलंबून

  84

मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने महाविकास आघाडीकडून जागावाटपावर अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीकडून येणारे प्रस्ताव आणि अटी व शर्थींमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) अखेर वंचित बहुजन आघाडीशिवाय (Vanchit Bahujan Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला (MVA) जवळपास निश्चित केला आहे. त्यामुळे वंचितकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास लवकरच महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होऊन जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने जागावाटपावर जवळपास शिकामोर्तब केले आहे. त्यानुसार आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट राज्यात २२ जागा लढवणार असून शरद पवार गट १० जागांवर, तर काँग्रेस १६ जागांवर निवडणूक लढवणार आहे.


त्यामुळे ठाकरे गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडली जाऊ शकते. महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देईल, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे, सांगली जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे.


दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीकडे तब्बल १७ जागांचा प्रस्ताव आल्याने तो अशक्यप्राय असल्याने तो अमान्य करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावाशिवाय अन्य कोणताही नविन प्रस्ताव महाविकास आघाडी देणार नसून वंचितने निर्णय घेतल्यानंतर जागा कोणत्या द्यायच्या याचा पुढील विचार केला जाईल, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमत केले आहे.


वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने अजूनही चर्चेचे दरवाजे खुले ठेवले असले, तरी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका पाहता महाविकास आघाडीत ते खरंच येत आहेत की न येण्यासाठी कारणांची मालिका उपस्थित करत आहेत? अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.


दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेऊन आम्हाला कळवावे, त्यानंतरच आम्ही सकारात्मक चर्चा करू, अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे आता वंचित काय निर्णय घेणार यावर महाविकास आघाडीचे जागावाटप अवलंबून असेल.

Comments
Add Comment

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा