वंचितच्या निर्णयावर महाविकास आघाडीचे जागावाटप अवलंबून

मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने महाविकास आघाडीकडून जागावाटपावर अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीकडून येणारे प्रस्ताव आणि अटी व शर्थींमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) अखेर वंचित बहुजन आघाडीशिवाय (Vanchit Bahujan Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला (MVA) जवळपास निश्चित केला आहे. त्यामुळे वंचितकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास लवकरच महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होऊन जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने जागावाटपावर जवळपास शिकामोर्तब केले आहे. त्यानुसार आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट राज्यात २२ जागा लढवणार असून शरद पवार गट १० जागांवर, तर काँग्रेस १६ जागांवर निवडणूक लढवणार आहे.


त्यामुळे ठाकरे गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडली जाऊ शकते. महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देईल, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे, सांगली जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे.


दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीकडे तब्बल १७ जागांचा प्रस्ताव आल्याने तो अशक्यप्राय असल्याने तो अमान्य करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावाशिवाय अन्य कोणताही नविन प्रस्ताव महाविकास आघाडी देणार नसून वंचितने निर्णय घेतल्यानंतर जागा कोणत्या द्यायच्या याचा पुढील विचार केला जाईल, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमत केले आहे.


वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने अजूनही चर्चेचे दरवाजे खुले ठेवले असले, तरी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका पाहता महाविकास आघाडीत ते खरंच येत आहेत की न येण्यासाठी कारणांची मालिका उपस्थित करत आहेत? अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.


दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेऊन आम्हाला कळवावे, त्यानंतरच आम्ही सकारात्मक चर्चा करू, अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे आता वंचित काय निर्णय घेणार यावर महाविकास आघाडीचे जागावाटप अवलंबून असेल.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध