४ जूनला नव्हे तर २ जूनला लागणार या राज्यात निवडणुकीचे निकाल

नवी दिल्ली: अरूणाचल प्रदेश(arunachal pradesh) आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनऐवजी २ जूनला लागणार आहेत. खरंतर, दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाल २ जूनला संपत आहे. अशातच मतमोजणीचे काम २ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाले पाहिजे. हे लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी ४ जूनची तारीख ठरवली होती. त्यात बदल केला आहे. आता येथील मतमोजणी २ जूनला होणार आहे.


अरूणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानलभा निवडणुकीसाठी मतदान १९ एप्रिलला होणार आहे. आयोगानुसार विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० मार्चला जारी होईल. यांतर नामांकन प्रक्रिया सुरू केली जाईल. नाव मागे घेण्याची शेवटची तारीख ३० मार्चला आहे.



अरूणाचलमध्ये दोन लोकसभा आणि ६० विधानसभेच्या जागा


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी ४ जूनला होणार होती. अरूणाचलमध्ये लोकसभेच्या २ जागा आणि विधानसभेच्या ६० जागा आहे. राज्याचा सध्याचा विधानसभेचा कार्यकाल २ जूनला संपत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने राज्यातील दोन लोकसभा जागांवर विजय मिळवला होता. विधानसभेत भाजपने ४१ जागा जिंकल्या तर जनता दल(युनायटेड)ने सात जागा, एनपीपीने पाच आणि काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवला होता. पीपीएने एक जागा जिंकली तर दोन अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात