४ जूनला नव्हे तर २ जूनला लागणार या राज्यात निवडणुकीचे निकाल

  97

नवी दिल्ली: अरूणाचल प्रदेश(arunachal pradesh) आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनऐवजी २ जूनला लागणार आहेत. खरंतर, दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाल २ जूनला संपत आहे. अशातच मतमोजणीचे काम २ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाले पाहिजे. हे लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी ४ जूनची तारीख ठरवली होती. त्यात बदल केला आहे. आता येथील मतमोजणी २ जूनला होणार आहे.


अरूणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानलभा निवडणुकीसाठी मतदान १९ एप्रिलला होणार आहे. आयोगानुसार विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० मार्चला जारी होईल. यांतर नामांकन प्रक्रिया सुरू केली जाईल. नाव मागे घेण्याची शेवटची तारीख ३० मार्चला आहे.



अरूणाचलमध्ये दोन लोकसभा आणि ६० विधानसभेच्या जागा


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी ४ जूनला होणार होती. अरूणाचलमध्ये लोकसभेच्या २ जागा आणि विधानसभेच्या ६० जागा आहे. राज्याचा सध्याचा विधानसभेचा कार्यकाल २ जूनला संपत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने राज्यातील दोन लोकसभा जागांवर विजय मिळवला होता. विधानसभेत भाजपने ४१ जागा जिंकल्या तर जनता दल(युनायटेड)ने सात जागा, एनपीपीने पाच आणि काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवला होता. पीपीएने एक जागा जिंकली तर दोन अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या