४ जूनला नव्हे तर २ जूनला लागणार या राज्यात निवडणुकीचे निकाल

नवी दिल्ली: अरूणाचल प्रदेश(arunachal pradesh) आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनऐवजी २ जूनला लागणार आहेत. खरंतर, दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाल २ जूनला संपत आहे. अशातच मतमोजणीचे काम २ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाले पाहिजे. हे लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी ४ जूनची तारीख ठरवली होती. त्यात बदल केला आहे. आता येथील मतमोजणी २ जूनला होणार आहे.


अरूणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानलभा निवडणुकीसाठी मतदान १९ एप्रिलला होणार आहे. आयोगानुसार विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० मार्चला जारी होईल. यांतर नामांकन प्रक्रिया सुरू केली जाईल. नाव मागे घेण्याची शेवटची तारीख ३० मार्चला आहे.



अरूणाचलमध्ये दोन लोकसभा आणि ६० विधानसभेच्या जागा


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी ४ जूनला होणार होती. अरूणाचलमध्ये लोकसभेच्या २ जागा आणि विधानसभेच्या ६० जागा आहे. राज्याचा सध्याचा विधानसभेचा कार्यकाल २ जूनला संपत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने राज्यातील दोन लोकसभा जागांवर विजय मिळवला होता. विधानसभेत भाजपने ४१ जागा जिंकल्या तर जनता दल(युनायटेड)ने सात जागा, एनपीपीने पाच आणि काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवला होता. पीपीएने एक जागा जिंकली तर दोन अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडच्या राजधानीत ढगफूटी! घरं, गाड्या आणि दुकाने खेळण्यांसारख्या गेल्या वाहून

डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार