Vanchit and UBT : वंचितचा मतदार हवाय पण उमेदवार नको, म्हणून पडणाऱ्या जागा दिल्या!

  240

आरोप करत वंचितने नाकारल्या ठाकरे गटाने दिलेल्या जागा


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा आज जाहीर होणार असून आजपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू होणार आहे. मात्र, तारखा जाहीर होण्याची वेळ आली तरी महाविकास आघाडीमधील (MVA) जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले होते. तर मविआने जो चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, तो वंचितला मान्य नसल्याचे समोर आले आहे.


वंचित आघाडीला चार जागा दिल्यानंतर त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे संजय राऊत म्हणत होते. या चार जागांमध्ये अकोल्याच्या जागेसह अन्य तीन जागा आहेत. मात्र, यामध्ये दोन जागा वंचितकडून नाकारण्यात आल्या आहेत. वंचितच्या कार्यकारिणीची काल पुण्यात बैठक झाली. वंचितचे राज्य उपाध्यक्ष, प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दोन जागा नाकारल्याची घोषणा केली. राज्य कार्यकारिणीने एकमताने हा प्रस्ताव फेटळाल्याचे ते म्हणाले.


सिद्धार्थ मोकळे म्हणाले, आम्ही अकोल्याची जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती, तरी आम्हाला हरण्याची शक्यता जास्त असलेल्या दोन जागा देण्यात आल्या. या जागा आम्हाला नको, असं ते म्हणाले. मविआच्या फेब्रुवारी महिन्यात अनेक बैठका झाल्या, त्यापैकी एकाही बैठकीला आम्हाला बोलविण्यात आले नाही. मार्चमध्येही बैठका झाल्या, अद्याप आमच्याशी मविआच्या कोणत्याही पक्षाने संवाद साधलेला नाही, असंही सिद्धार्थ मोकळे म्हणाले.


आम्ही काही फक्त तुमच्या जागा निवडून देण्यासाठी नाही आहोत. मविआला आमची गरज आहे. वंचितचा मतदार त्यांना हवाय पण वंचितचा उमेदवार नको. म्हणून पडणाऱ्या जागा द्यायच्या हे धोरण योग्य नाही, अशी टीका मोकळे यांनी केली. तसेच सुधारित प्रस्ताव द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

Comments
Add Comment

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात