Vanchit and UBT : वंचितचा मतदार हवाय पण उमेदवार नको, म्हणून पडणाऱ्या जागा दिल्या!

आरोप करत वंचितने नाकारल्या ठाकरे गटाने दिलेल्या जागा


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा आज जाहीर होणार असून आजपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू होणार आहे. मात्र, तारखा जाहीर होण्याची वेळ आली तरी महाविकास आघाडीमधील (MVA) जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले होते. तर मविआने जो चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, तो वंचितला मान्य नसल्याचे समोर आले आहे.


वंचित आघाडीला चार जागा दिल्यानंतर त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे संजय राऊत म्हणत होते. या चार जागांमध्ये अकोल्याच्या जागेसह अन्य तीन जागा आहेत. मात्र, यामध्ये दोन जागा वंचितकडून नाकारण्यात आल्या आहेत. वंचितच्या कार्यकारिणीची काल पुण्यात बैठक झाली. वंचितचे राज्य उपाध्यक्ष, प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दोन जागा नाकारल्याची घोषणा केली. राज्य कार्यकारिणीने एकमताने हा प्रस्ताव फेटळाल्याचे ते म्हणाले.


सिद्धार्थ मोकळे म्हणाले, आम्ही अकोल्याची जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती, तरी आम्हाला हरण्याची शक्यता जास्त असलेल्या दोन जागा देण्यात आल्या. या जागा आम्हाला नको, असं ते म्हणाले. मविआच्या फेब्रुवारी महिन्यात अनेक बैठका झाल्या, त्यापैकी एकाही बैठकीला आम्हाला बोलविण्यात आले नाही. मार्चमध्येही बैठका झाल्या, अद्याप आमच्याशी मविआच्या कोणत्याही पक्षाने संवाद साधलेला नाही, असंही सिद्धार्थ मोकळे म्हणाले.


आम्ही काही फक्त तुमच्या जागा निवडून देण्यासाठी नाही आहोत. मविआला आमची गरज आहे. वंचितचा मतदार त्यांना हवाय पण वंचितचा उमेदवार नको. म्हणून पडणाऱ्या जागा द्यायच्या हे धोरण योग्य नाही, अशी टीका मोकळे यांनी केली. तसेच सुधारित प्रस्ताव द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात