आयपीएलचा दुसरा टप्पा भारता बाहेर

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबईत सामन्यांची शक्यता


नवी दिल्ली : आयपीएल २०२४ चा पहिला भाग २२ मार्चपासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यातील पहिला सामना सीएसके आणि आससीबी यांच्यात चेन्नई येथे खेळवला जाईल, तर शेवटचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ७ एप्रिल रोजी खेळवला जाईल.


दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा दुसरा भाग भारताबाहेर आयोजित केला जाऊ शकतो, अशी अटकळ आता सुरू झाली आहे. बीसीसीआय आयपीएल २०२४ चा दुसरा टप्पा दुबईत आयोजित करण्याची योजना आखत आहे.


नुकत्याच १६ मार्चला भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करेल. सध्या बीसीसीआयचे काही उच्चपदस्थ अधिकारी या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, काही फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंचे पासपोर्ट घेतले आहेत, जेणेकरून जर आयपीएलचा दुसरा टप्पा दुबईत आयोजित केला गेला तर त्याची व्यवस्था लवकरात लवकर करता येईल. २०१४ च्या आयपीएलचा पहिला भाग देखील दुबईत निवडणुकीमुळे आयोजित करण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुसरा भाग दुबईत आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात