आयपीएलचा दुसरा टप्पा भारता बाहेर

Share

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबईत सामन्यांची शक्यता

नवी दिल्ली : आयपीएल २०२४ चा पहिला भाग २२ मार्चपासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यातील पहिला सामना सीएसके आणि आससीबी यांच्यात चेन्नई येथे खेळवला जाईल, तर शेवटचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ७ एप्रिल रोजी खेळवला जाईल.

दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा दुसरा भाग भारताबाहेर आयोजित केला जाऊ शकतो, अशी अटकळ आता सुरू झाली आहे. बीसीसीआय आयपीएल २०२४ चा दुसरा टप्पा दुबईत आयोजित करण्याची योजना आखत आहे.

नुकत्याच १६ मार्चला भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करेल. सध्या बीसीसीआयचे काही उच्चपदस्थ अधिकारी या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंचे पासपोर्ट घेतले आहेत, जेणेकरून जर आयपीएलचा दुसरा टप्पा दुबईत आयोजित केला गेला तर त्याची व्यवस्था लवकरात लवकर करता येईल. २०१४ च्या आयपीएलचा पहिला भाग देखील दुबईत निवडणुकीमुळे आयोजित करण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुसरा भाग दुबईत आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

7 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

8 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

8 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

9 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

10 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

10 hours ago