भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात


तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात भारतीय संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले होते. पण हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ७ गडी बाद १७५ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून हसिनी परेरा आणि इमेशा दुलानीने दमदार अर्धशतकं झळकावली. पण श्रीलंकेचा संघ विजयापासून १५ धावा दूर राहिला. ही मालिका भारतीय संघाने ५-० ने आपल्या नावावर केली.


या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी १७५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. संघाची कर्णधार चमारी अटापटू अवघ्या २ धावांवर माघारी परतली. हसिनी परेराने ६५ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इमेशा दुलानीने ५० धावांची खेळी केली. तर निलाक्षी डी सिल्वा अवघ्या ३ आणि कविशा दिल्हारीने ५ धावांवर माघारी परतली. शेवटी


या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. या सामन्यात स्मृती मानधनाला विश्रांती देण्यात आली. तिच्या जागी जी कमलिनीचा संघात समावेश करण्यात आला होता. पण तिला या संधीचा फायदा घेता आला नाही. कमलिनी अवघ्या १२ धावा करत माघारी परतली. तर गेल्या २ सामन्यांत लागोपाठ अर्धशतक झळकावणारी शफाली वर्मा अवघ्या ५ धावा करत माघारी परतली. हरलीन देओलला अवघ्या १३ धावा करता आल्या. भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने एक बाजू धरून ठेवली होती. हरमनप्रीतने ६८ धावांची दमदार खेळी केली. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखली जाणारी ऋचा घोष या सामन्यात अवघ्या ५ तर दीप्ती शर्मा अवघ्या ७ धावांवर माघारी परतली.हरमनप्रीत कौरने अमनजोत कौरसोबत मिळून महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तिने २१ धावा केल्या. तर शेवटी अरूंधती रेड्डीने नाबाद २७ धावा करत संघाची धावसंख्या ७ गडी बाद १७५ धावांपर्यंत पोहोचवली.


भारतीय संघाने मारली बाजी : येत्या काही महिन्यात भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे प्रत्येक मालिका ही सरावाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ केला. पाचही सामन्यांत फलंदाज आणि गोलंदाजांनी आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडली. यासह भारतीय संघाने ही मालिका ५-० ने आपल्या नावावर करून वर्षाचा शेवट गोड केला आहे.


संक्षिप्त धावफलक :


भारत महिला : २० षटकांत १७५/७


श्रीलंका महिला : २० षटकांत १६०/५

Comments
Add Comment

RR won : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार, राजस्थान रॉयल्सची विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप

लखनौ : रिषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्सला सोपा सामनाही जिंकता आला नाही. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील राजस्थान

MI- CSK IPL 2026 : मुंबई-चेन्नई सामन्यात धोनी खेळण्याची शक्यता; विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघात दाखल

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणाऱ्या आयपीएल २०२६ च्या

IPL 2026 Tilak Varma : तिलक वर्माच्या शानदार शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा विजय

अहमदाबाद :  तिलक वर्माची स्फोटक फलंदाजी आणि अश्विनी कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरात

BCCI New Plan : एकाच वेळी दोन मोठ्या स्पर्धांमध्ये उतरणार भारतीय संघ; श्रेयस अय्यर करणार नेतृत्व?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) एकाच वेळी दोन स्पर्धात्मक टी-२० स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील अशा

ETPL Abhishek Bachchan's Team : अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखालील ETPL ची ग्लासगो फ्रँचायझीची घोषणा; ख्रिस गेल आणि मुगाफी ग्रुपकडे संघाची मालकी

युरोपमधील पहिली आयसीसी-मान्यताप्राप्त T20 स्पर्धा ‘युरोपियन T20 प्रीमियर लीग’ (ETPL)ने आपल्या ग्लासगो-स्थित फ्रँचायझी

Indian Women's Team : भारतीय महिला संघाचा सलग दुसरा पराभव, द. आफ्रिकेचा ८ विकेट्सने विजय

डर्बन : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील