पेट्रोल-डिझेलचे दर २ रूपयांनी झाले स्वस्त, सकाळपासून नवे दर लागू

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने लोकांना दिलासा देत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत २ रूपयांनी कपात केली आहे. कमी झालेले दर १५ मार्चपासून सकाळी ६ वाजल्यापासून लागू होत आहेत. तर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २ रूपयांनी कपात करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सिद्ध केले की कोट्यावधी भारतीयांच्या कुटुंबांचे हित आणि सुविधा हेच त्यांच्यासाठी प्राधान्य आहे.


ते म्हणाले जेव्हा जगात कठीण काळ सुरू होता. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या किंमतीत ५०-७२ टक्के वाढ झाली होती. आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांमध्ये पेट्रोल मिळणे बंद झाले होते. ५० वर्षातील सर्वात मोठे तेल संकट आलेले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि सहज नेतृत्वामुळे देशावर कोणतेही संकट आले नाही.



पेट्रोलचे दर


नवी दिल्ली - आधीचे दर ९६.७२ रूपये
आताचे दर ९४.७२ रूपये


मुंबई - आधीचे दर १०६.३१ रूपये
आताचे दर १०४.२१ रूपये


कोलकाता - आधीचे दर १०६.०३ रूपये
आताचे दर १०३.९४ रूपये


चेन्नई - आधीचे दर १०२.६३ रूपये
आताचे दर १००.७५ रूपये



डिझेलचे दर


नवी दिल्ली - आधीचे दर ८९.६२ रूपये
आताचे द ८७.६२ रूपये

मुंबई - आधीचे दर ९४.२७ रूपये
आताचे दर ९२.१५ रूपये

कोलकाता - आधीचे दर ९२,७६ रूपये
आताचे दर ९०.७६ रूपये

चेन्नई - आधीचे दर ९४.२४ रूपये
आताचे दर ९२.३४ रूपये

 

 


Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या