Pankaja Munde : धनंजय मुंडेंनी सहकार्य केले तर... काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

लोकसभा उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडेंबाबतही व्यक्त झाल्या पंकजाताई


बीड : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काल ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील २० जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचा पत्ता कट झाला आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत ही सन्मानाची गोष्ट असल्याचे म्हटले. तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि प्रीतम मुंडे यांच्याविषयीही त्या व्यक्त झाल्या.


पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकसभेसाठी मला उमेदवारी जाहीर झाली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्यामुळे माझी भावना आभाराची आहे. थोडी संमिश्र भावना यासाठी आहे कारण १० वर्षे प्रीतम मुंडे खासदार होत्या. मी राज्याचं राजकारण करत होते. आता केंद्रात राजकारण करणार आहे. तसा प्रभारी म्हणून कामाचा अनुभव आला आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर डॉक्टरीपेशा सोडून प्रीतम राजकारणात आल्या, गेली १० वर्षे त्या संसदेत होत्या. आमच्या दोघींमध्ये समन्वय होता. प्रीतम मुंडेंना मी विस्तारीत करणार नाही. त्या शद्बावर मी कायम आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.



मी निवडून येण्यासाठी धनंजय मुंडेंचं योगदान असेल


उमेदवारी जाहीर झाली आता धनंजय मुंडे यांची भेट घेणार का? यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, "माझे बंधू धनंजय हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचा पक्ष आणि भाजप यांची राज्यात युती आहे. त्यामुळे जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत. आमच्या युतीनंतर माझ्या मतदार संघावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यानंतर मला लोकसभेची संधी मिळाली. त्यामुळे जेवढ्या मताने प्रीतमताई निवडून आली होती. त्यापेक्षा जास्त मताने मी निवडून येण्यासाठी त्यांचं योगदान असेल."



धनंजय मुंडेंनी सहकार्य केले तर...


धनंजय मुंडेंना परळीत सहकार्य करणार का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेत आम्हाला जास्त त्रास होणार नाही. त्यांनी सहकार्य केले तर त्यांना देखील सहकार्य मिळेल.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली