IPL आधी KKRला मोठा झटका, हा खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त

  63

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(IPL)च्या १७व्या हंगामाची सुरूवात २२ मार्चपासून होत आहे. आयपीएल २०२४च्या सुरूवातीआधीच कोलकाता नाईट रायडर्सचे टेन्शन वाढले आहे.


संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. मुंबई-विदर्भ यांच्यात रंगलेल्या रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात श्रेयसला पाठीला दुखापत झाली. श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे रणजी फायनलच्या चौथ्या तसेच पाचव्या दिवशी फिल्डिंगसाठी उतरला नाही.


मीडिया रिपोर्टनुसार श्रेयस अय्यर आता पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२४च्या सुरूवातीच्या सामन्यातून बाहेर गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार श्रेयसचे पाठीचे दुखणे पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये तो खेळण्याची शक्यता कमी आहे.


रणजी ट्रॉफीच्या फायनलदरम्यान मुंबईच्या दुसऱ्या डावात श्रेयसने ९५ धावा केल्या. त्याच्या या खेळी दरम्यान त्याचे पाठीचे दुखणे पुन्हा उफाळून आले.


श्रेयस पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी संपूर्ण आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. एप्रिलमध्ये त्याच्या पाठीची सर्जरी झाली होती. यानंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर गेला होता.

Comments
Add Comment

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे