Anil Parab : उबाठाच्या अनिल परब यांना धक्का! साई रिसॉर्ट पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश

किरीट सोमय्या यांनी केला होता आरोप; नेमकं प्रकरण काय?


रत्नागिरी : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ आलेल्या असताना ठाकरे गटाच्या (Thackeray group) एका महत्त्वाच्या नेत्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबई हायकोर्टाने (Mumbai Highcourt) अनिल परब यांना रत्नागिरीतील (Ratnagiri) दापोली येथील त्यांचं साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनिल परब (Anil Parab) आणि सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार आहे.


भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी २०२० मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सोमय्या आणि अनिल परब या दोघांमध्ये या मुद्द्यावरुन वाद प्रतिवाद झाले होते. त्यानंतर आज मुंबई हायकोर्टाने चार आठवड्यात रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार हे आता निश्चित झालं आहे.



नेमकं प्रकरण काय?


मागे खेड जिल्हा कोर्टाने दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. हे रिसॉर्ट आधी अनिल परब यांच्या मालकीचे होते. त्यानंतर हे रिसॉर्ट त्यांचे मित्र आणि राजकीय नेते सदानंद कदम यांना विकण्यात आले होते. बांधकाम करताना अनेक अनियमितता आढळल्या होत्या. त्यानंतर मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते.


राष्ट्रीय हरित लवादाने एक तज्त्र समिती स्थापन केली होती. समितीने रिसॉर्टची पाहणी केली होती. यामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत जागा पूर्वीप्रमाणे करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली होती. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, याबाबत त्यांना कोणताही दिलासा मिळाला नसून रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह