Amit Shah : अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंचं राजकारण!

CAA कायद्यावरुन भाजपवर केलेल्या टीकेमुळे अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर


ममता बॅनर्जींवरही केला हल्लाबोल


मुंबई : संसदेने (Parliament) मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी CAA म्हणजेच वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा केंद्र सरकारने (Central government) सोमवारी लागू केला. हा कायदा लागू केल्यानंतर विरोधकांनी टीका केली, मात्र तो मागे घेतला जाणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी केलं आहे. यासंदर्भात ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जी टीका केली त्यानंतर उद्धव ठाकरेंना अमित शाह यांनी खुलं आव्हान दिलं आहे.


अमित शाह म्हणाले, “उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुमचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही हा कायदा आणला आहे. पण मी उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो, तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा. उद्धव ठाकरे हे सांगू इच्छितात की कायदा नको? देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी हे आव्हान देतो की त्यांनी हे स्पष्ट करावं की हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला नको, उद्धव ठाकरेंनी हे सांगितलं आहे. राजकारण करु नका, मी थेट उद्धव ठाकरेंना विचारतो आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा. उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत म्हणून ते राजकारण करत आहेत. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे", असं अमित शाहांनी स्पष्ट केलं.



ममता बॅनर्जींवरही केली टीका


अमित शाह म्हणाले, "ममता बॅनर्जींना हात जोडून विनंती करतो आहे की राजकारण करण्यासाठी खूप सारे मार्ग आहेत. बांगलादेशातून आलेल्या बंगाली हिंदूंचं अहित करु नका. बांगलादेशातून जे बंगाली हिंदू आले आहेत त्यांना नागरिकत्व देण्यासाठी आम्ही कायदा आणत आहोत. हिंदू-मुस्लिम यांच्यात विसंवाद निर्माण करुन ममता बॅनर्जी राजकारण करत आहेत. मला त्यांनी एक कायद्यातली एक तरतूद दाखवावी की जी नागरिकता हिरावून घेते. बंगालबाबत तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की लवकरच पश्चिम बंगालमध्येही भाजपाचं सरकार येईल. ममता बॅनर्जी घुसखोरीचं समर्थन करणार असतील तर तिथे त्यांचं सरकार राहणार नाही", असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.



हा विषय केंद्राचा आहे, राज्यांचा नव्हे : अमित शाह


“सीएए कायद्यात विविध तरतुदी आहेत. सहाव्या सूचीत जी क्षेत्रं आहेत तिथे सीएए लागू होणार नाही. कुणी तिथून अर्ज केला तरीही तिथून ते स्वीकारलं जाणार नाही. सीएए कायदा हा भारताचं नागरिकत्व देणारा कायदा आहे. कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याचा हा कायदा नाही. केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांना कायदा नाकारण्याचा अधिकार नाही. कारण संसदेचा तो अधिकार आहे. हा विषय केंद्राचा आहे. केंद्र आणि राज्यांचा विषय नाही.” असंही अमित शाह म्हणाले.

Comments
Add Comment

US Secretary meets PM Modi : अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रुबियो यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने व्हाईट हाऊसला भेट देण्याचे निमंत्रण नवी दिल्ली :

Indian Army Cheetah Helicopter : भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले, ३ अधिकारी किरकोळ जखमी

- अपघाताचे कारण शोधण्यासाठी पुढील चौकशी सुरू लडाख : लडाखच्या दुर्गम आणि उच्च पर्वतीय भागात भारतीय लष्कराच्या

Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर आणखी एक घाव! एक्स-इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत असलेल्या अभिजीत दिपके यांच्या

Karnataka Road Accident : कर्नाटक हादरलं! कलबुर्गीत मृत्यूचा कहर; भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ५ जण ठार

कर्नाटक : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात काल म्हणजेच शुक्रवार २२ मे रोजी मध्यरात्री भीषण रस्ता अपघात झाला.

Agni-1 Missile : ओडिशात करण्यात आली अग्नी १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; भारताचा शत्रुराष्ट्रांना स्पष्ट इशारा

ओडिशा : भारताने आपल्या सामरिक क्षमतेत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ओडिशातील एकात्मिक चाचणी श्रेणी

Supreme Court : आई वडील IAS असल्यास मुलांना OBC आरक्षणाचा लाभ का ? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेयरची मर्यादा या विषयावर सर्वोच्च न्यायालयात एक सुनावणी सुरू होती. या