Nothing Phone 2aचा बंपर सेल, ६० मिनिटांत विकले गेले ६० हजार फोन्स- कंपनीचा दावा

मुंबई: Nothing Phone 2a या मोबाईल फोनवर १२ मार्चला सेल लागला होता. सेल लागताच या फोनची बंपर विक्री झाली आहे. कंपनीने दावा केला आहे की काही मिनिटातंच या स्मार्टफोनचे अनेक हजार युनिट्स विकले गेले. Nothing Phone 2a हा फोन नुकताच कंपनीने लाँच केला आहे.


हा ब्रँडचा सर्वात स्वस्त फोन आहे यात अनेक आकर्षक फीचर्स आहेत. यात कंपनीने ट्रान्सपॅरेंट बॅक, 50MP+50Mp ड्युअल रेयर कॅमेरा तसेच ५००००एमएएच बॅटरी सारखे फीचर्स दिले आहेत.



६० हजार युनिट्सची विक्री


कंपनीने दावा केला आहे की ६० मिनिटांत त्यांच्या ६० हजार युनिट्सची विक्री झाली आहे. यासाठी कंपनीने फ्लिपकार्ट, क्रोमा स्टोर, विजय सेल्स आणि दुसऱ्या प्रमुख रिटेल स्टोर्सचे आभार मानले आहे.


हा सेल दुपारी १२ वाजता सुरू झाला होता. कंपनीने हा हँडसेट तीन कॉन्फिग्रेशन आणि दोन रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच केला आहे. याच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रूपये आहे तर २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत २५,९९९ आणि १२ जीबी रॅमच्या व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रूपये आहे.


यावर २००० रूपये बँक डिस्काऊंट HDFC बँक कार्ड होल्डर्सला मिळत होता. याश्वाय फ्लिपकार्ट एक्सक्लुसिव्ह प्रमोशन कूपनच्या माध्यमातून २००० रूपयांचा डिस्काऊंट मिळत होता.सोबतच कंपनी २००० रूपयांचा एक्सचेंज बोनसही देत होती. या ऑफर्सनंतर फोनच्या सुरूवातीची किंमत १९,९९९ रूपये झाली होती.



स्पेसिफिकेशन


६.७ इंचाचा FHD+OLED डिस्प्ले
कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन
MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसर
८ जीबी रॅम आणि १२ जीबी रॅम
१२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज
50MP+50Mpड्युअल कॅ्रा
32MP सेल्फी कॅमेरा
५००००एमएएच बॅटरी

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.