Sangeet Manapman : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर येतोय ‘संगीत मानापमान’!

Share

पोस्टर शेअर करत दिग्दर्शक सुबोध भावेने जाहीर केली प्रदर्शनाची तारीख

मुंबई : मराठी रंगभूमीवर (Marathi Rangbhumi) संगीत नाटके (Musical plays) विशेष गाजली. मराठी रंगभूमीचा प्रदीर्घ इत्हास सागंताना कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (Krishnaji Prabhakar Khadilkar) यांचे नाव हमखास निघते. मराठी रसिकांच्या मनात नाटकाचे अढळ स्थान निर्माण करण्यात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. त्यांनी लिहिलेले ‘संगीत मानापमान’ (Sangeet Manapman) हे नाटक प्रचंड गाजले. आज या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ११३ वर्षे पूर्ण होत आहेत. हा मुहूर्त साधून प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने आगामी ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर १ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सुबोध भावे याने आजवर आपल्या अनेकविध भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जीवनपट असो वा खलनायकी भूमिका सुबोधने प्रत्येक भूमिका आपल्या अभिनयाने जीवंत केली आहे. ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शकाच्या (Director) भूमिकेत दिसणार आहे. याआधी त्याने ‘कट्यार काळजात घुसली’ (Katyar Kaljat ghusali) या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. यातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. त्याचा नवा चित्रपट ‘संगीत मानापमान’ देखील एक संगीतमय चित्रपट असणार आहे. शंकर एहसान लॉय (Shankar Ehsaan Loy) यांनी या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे या चित्रपटातील गाणीदेखील तितकीच लोकप्रिय होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘संगीत मानापमान’ या चित्रपटाची कथा कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित नाटकाच्या कथेवरुनच प्रेरित आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी ज्योती देशपांडे यांनी सांभाळली आहे. सुबोधच्या पोस्टवर प्रेक्षकांच्या कमेंट्स पाहता या चित्रपटाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

38 mins ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

1 hour ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

2 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

3 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

3 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

4 hours ago