Vasant More : 'एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर...' वसंत मोरेंचा रोख नेमका कोणाकडे?

  157

पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना


मुंबई : मनसे नेते (MNS leader) वसंत मोरे (Vasant More) अनेक कारणांवरुन चर्चेत असतात. ते मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मात्र, मागील काही दिवसांतील त्यांच्या हालचालीवरुन ते पक्षांतर्गत गोष्टींवरुन नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आज त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन (Social Media Account) केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना आणखी पाठबळ मिळालं आहे. या नाराजीतूनच वसंत मोरे वेगळा राजकीय निर्णय घेतात की काय, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.


वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात म्हटले आहे की, 'एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो... त्यानंतर ना कोणाकडे तक्रार कतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो...'. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांचा नेमका रोख कोणाकडे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



मागच्या काही वर्षांपासून वसंत मोरे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. काही वेळा जाहीरपणे, काहीवेळा अंतर्गत तर कित्येकदा सोशल मीडियातून त्यांची नाराजी उघड झालेली आहे. एवढं सगळं होऊनही त्यांनी राज ठाकरे यांची साथ कधी सोडलेली नाही. मात्र, आता लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) दोन-तीन दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे मनसे पक्षातली अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. आपल्याला कुणाकडूनही अपेक्षा नाहीत, असं म्हणत वसंत मोरे यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यामुळे ते भविष्यात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही