Dharavi Umesh Keelu : भले शाब्बास! उमेश कीलू बनला धारावीतील पहिला आर्मी ऑफिसर

दहा बाय पाच फूटाची खोली, वडिलांचा मृत्यू... पण उमेशचा धीर नाही खचला


मुंबई : हलाखीची आर्थिक परिस्थिती, तुटपुंजं वेतन, गरजेच्या सोयीसुविधांचा अभाव ही आव्हाने समोर उभी ठाकलेली असतानाही उंचच उंच भरारी मारणार्‍या अनेक तरुणांची कहाणी आजवर आपण ऐकली आहे. या कहाण्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असतात. असाच एक आदर्श घालून ठेवला आहे धारावीच्या (Dharavi) उमेश कीलू (Umesh Keelu) याने. केवळ दहा बाय पाच फूटांच्या खोलीत राहून आणि वडिलांच्या निधनाचा मोठा धक्का पचवून उमेश आर्मी ऑफिसर (Army officer) बनला आहे. त्याच्या या यशाचं (Success) सर्वच स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे.


खरं तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी. अगदी लहानलहान गल्ल्या, त्यात पाय ठेवताच संपणारी लहान आकाराची घरं, पाणी, वीज यांसारख्या गरजेच्या वस्तूंचा अभाव असलेली धारावी गुन्हेगारीसाठीही प्रसिद्ध आहे. मात्र, याच धारावीत राहून उमेशने आपलं स्वप्न साकार केलं आहे. मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याचं उमेश ज्वलंत उदाहरण आहे.


उमेश कीलू आवश्यक सुविधा नसतानाही भारतीय लष्करात कमिशन्ड ऑफिसर झाला आहे. शनिवारी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये पासिंग आऊट परेडचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतर तो आता लेफ्टनंट झाला आहे. त्यामुळे त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण धारावी जमली होती.



कशी आहे उमेशची कारकीर्द?


उमेश कीलूचा जन्म मुंबईतील धारावीच्या सायन कोळीवाडा झोपडपट्टीत झाला. १० बाय ५ फुटांच्या घरात तो आपल्या कुटुंबासह राहत होता. सर्व आर्थिक अडचणी असतानाही त्याने IT मध्ये B.Sc आणि Computer Science मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. एनसीसी एअर विंगशी असलेल्या संबंधामुळे त्याला सी प्रमाणपत्र मिळाले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने सायबर कॅफेमध्ये अर्धवेळ नोकरी केली आणि संगणक ऑपरेटर म्हणून काम केले. तसेच त्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ब्रिटीश कौन्सिलसह आयटी सेवा क्षेत्रातही काम केले. उमेश कीलूने गेल्या काही वर्षांत सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) पास करण्यासाठी एकूण १२ प्रयत्न केले, त्यानंतर तो आता प्रतिष्ठित अकादमीमध्ये सामील झाला आहे.


याच दरम्यान उमेशच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. २०१३ मध्ये त्यांना अर्धांगवायू झाला. यानंतर त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली, कारण तो घरात एकमेव कमावता होता. वडिलांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर तो मुंबई धारावी येथे अंत्यसंस्कारासाठी गेला आणि नंतर अकादमीत परतला. त्याने मोठ्या समर्पणाने कठोर परिश्रम केले आणि कमिशन्ड ऑफिसर बनून आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले.



काय आहेत उमेशच्या भावना?


पीटीआयशी बोलताना उमेशने म्हटले की, माझे वडील पेंटर होते. २०१३ मध्ये त्यांना अर्धांगवायू झाला आणि तेव्हापासून ते अंथरुणाला खिळून होते. सैन्य प्रशिक्षणासाठी रिपोर्ट करण्याच्या एक दिवस आधी मार्च २०२३ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आज मी माझे ११ महिने प्रशिक्षण पूर्ण केले आणि सैन्यात एक कमिशन्ड ऑफिसर आहे. मी त्या भागातील (धारावी, मुंबई) पहिला अधिकारी आहे आणि हा खूप अभिमानाचा क्षण आहे. तेथे प्रचंड बेरोजगारी आहे आणि मला आशा आहे की ते देखील माझ्याकडून प्रेरित होऊन सैन्यात सामील होतील'', अशा भावना उमेशने व्यक्त केल्या.


Comments
Add Comment

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच