आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: उपवास करणे हे केवळ अध्यात्मिकरित्या नव्हे तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. हिंदू धर्मात तर वर्षभर कोणते ना कोणते उपवास सुरूच असतात. याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. मेडिकल सायन्समध्ये तर इंटरमिटेंट फास्टिंगबाबत अनेक रिसर्च सुरू असतात. अनेक आरोग्य तज्ञांच्या मते तर उपवास हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यांच्या मते दर दिवसाच्या खाण्यामध्ये जास्त गॅप नव्हे तर आठवड्यातून एक दिवस उपवास केल्यास अनेक फायदे होतात.



आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचा परिणाम


जेव्हा तुम्ही आठवड्यातून एक दिवस उपवास करता आणि २४ तास काही ात नाही तेव्हा आपले शरीर बॉडीमध्ये जमा असलेले फॅट वापरते. या दरम्यान, कॅलरी असलेले पदार्थ खाऊ नये. तुम्ही पाणी पिऊ शकता. तुम्ही कॅलरी नसलेले कोल्ड ड्रिंक घेऊ शकता. अनेक रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की असे केल्याने वेट लॉस होतो. तसेच मेटाबॉलिज्मवरही परिणाम होतो. इतकंच नव्हे तर हृदयाच्या आरोग्यासाठीही हे फायदेशीर आहे.



उपवास केल्याने कमी होऊ शकते वजन


आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. दरम्यान, यासाठीची योग्य पद्धत माहिती पाहिजे. उपवासादरम्यान लोक बटाटा अथवा फ्रुट्स हे अधिक कॅलरीज असलेले पदार्थ खातात. तसेच एक्सरसाईजही करत नाहीत. यामुळे त्यांना अधिक फायदा होत नाही.



उपवासाचे हे ही फायदे


२४ तासच्या उपवासाबाबत रिसर्च सांगतात की यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. प्राण्यांवर झालेल्या रिसर्चमध्ये असेही समोर आले की यामुळे कॅन्सरपासूनही बचाव होतो.



कोणी उपवास करू नये


डायबिटीजचे रुग्ण, प्रेग्नंट महिला तसेच काही आजार असलेल्या लोकांनी उपवास करू नये.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी