Rajsthan politics : राजस्थानमध्ये ३२ नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडत हाती धरले कमळ!

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का!


जयपूर : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तयारीत सर्व राजकीय पक्ष (Political parties) गुंतलेले असतानाच काँग्रेसला (Congress) मात्र ऐन निवडणुकांच्या वेळी पक्ष सोडून चाललेल्या आपल्या नेत्यांची चिंता करावी लागत आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानमध्ये (Rajsthan) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे निकटवर्तीय असलेले माजी मंत्री आणि काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे.


मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत जयपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात काँग्रसेच्या ३२ नेत्यांचा भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसच्या या आघाडीच्या नेत्यांसह त्यांच्या अनेक समर्थकांनी पक्षाची साथ सोडत कमळ हातात घेतले.


राजस्थान काँग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीमुळे येथील समीकरणं बदलली आहेत. काँग्रेसची साथ सोडून भाजपात आलेल्या नेत्यांमध्ये नागौरमधील अनेक दिग्गज जाट नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसमधून झालेल्या पक्षांतरामुळे भाजपामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर आता राजस्थानमध्ये पुन्हा एकदा २५ पैकी २५ जागा जिंकण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.



पक्षांतर करणार्‍या नेत्यांमध्ये कोणाचा समावेश?


काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांमध्ये लालचंद कटारिया यांच्यासह गेहलोत सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेले राजेंद्र यादव, माजी आमदार रिछपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, आलोक बेनीवाल, विजयपाल मिर्धा, भीलवाडाचे माजी जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे. या नेत्यांपैकी कटारिया हे अशोक गेहलोत यांचे समर्थक आहेत. तर खिलाडीलाल बैरवा हे सचिन पालयट यांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच रामपाल शर्मा हे सी.पी. जोशी यांचे निकटवर्तीय आहेत.


भाजपामध्ये आलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये दोन माजी मंत्री आणि ४ माजी आमदारांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय माजी आमदार रामनारायण किसान, अनिल व्यास, निवृत्त आयएएस ओंकार सिंह चौधरी, गोपालरामा कुकुणा, अशोक जांगिड, प्रिया सिंह मेघवाल, सेवालदाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश चौधरी, राजेंदेर परसवाल, शैतान सिंह मेहरडा, रामनारायण झाझडा यांचाही समावेश आहे.

Comments
Add Comment

Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत 9 जणांचा करुण अंत, माय-लेकाचा 'तो' क्षण काळीज पिळवटून टाकणारा; नेमकं काय घडलं ?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील जबलपूर इथलं लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणावर गुरुवारी रात्री एका

LPG Gas Price Hike : महागाईचा भडका! तब्बल ९९३ रुपयांनी महागला गॅस सिलेंडर; जाणून घ्या एका सिलेंडरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक

Madhya Pradesh Narmada cruise accident : बरगी धरणात क्रूझ बुडाले, ४ जणांचा मृत्यू,१०-१५ बेपत्ता

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला.

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण