Mahashivratri 2024 : दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी उपवासाच्या दिवशी खा हे पदार्थ

मुंबई: आज संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. या दिवशी अनेकांचा उपवासदेखील असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमचाही उपवास असेल तर संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये जरूर समावेश करा.



साबुदाणा


साबुदाणा उपवासादरम्यान खाल्ला जाणारा पदार्थ आहे. साबुदाणा खिचडी अथवा खीर खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. तसेच यामुळे तुम्हाला एनर्जीही मिळते. यात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात जे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करतात. मात्र साबुदाणा आणि केळी खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे वेट लॉस करणाऱ्यांनी थोड्या बेतानेच खावे.



मखाणे 


मखाण्याची खीर अथवा रोस्टेड मखाणे हे प्रोटीन आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे दीर्घकाळ एनर्जेटिक वाटते.



दही


दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते जे आपल्या बराच वेळ पोट भरल्याचे फील करून देते.



नट्स आणि ड्रायफ्रुट्स


बदाम, अक्रोड काजूसारख्या नट्स आणि ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात एनर्जी असते. यामुळे भूक शांत होते.



फळे


उपवासादरम्यान तुम्ही सफरचंद, पपईसारखी फळे खाल्ली पाहिजेत. यात फायबर मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि