Mahashivratri 2024 : दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी उपवासाच्या दिवशी खा हे पदार्थ

मुंबई: आज संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. या दिवशी अनेकांचा उपवासदेखील असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमचाही उपवास असेल तर संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये जरूर समावेश करा.



साबुदाणा


साबुदाणा उपवासादरम्यान खाल्ला जाणारा पदार्थ आहे. साबुदाणा खिचडी अथवा खीर खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. तसेच यामुळे तुम्हाला एनर्जीही मिळते. यात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात जे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करतात. मात्र साबुदाणा आणि केळी खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे वेट लॉस करणाऱ्यांनी थोड्या बेतानेच खावे.



मखाणे 


मखाण्याची खीर अथवा रोस्टेड मखाणे हे प्रोटीन आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे दीर्घकाळ एनर्जेटिक वाटते.



दही


दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते जे आपल्या बराच वेळ पोट भरल्याचे फील करून देते.



नट्स आणि ड्रायफ्रुट्स


बदाम, अक्रोड काजूसारख्या नट्स आणि ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात एनर्जी असते. यामुळे भूक शांत होते.



फळे


उपवासादरम्यान तुम्ही सफरचंद, पपईसारखी फळे खाल्ली पाहिजेत. यात फायबर मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी