Lok Sabha Election 2024: आज येणार काँग्रेसची पहिली यादी! ४० उमेदवारांची असतील नावे, मैदानात राहुल गांधी-शशी थरूर

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने १९५ नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता काँग्रेसही लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यात अनेक नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते.


भाजपप्रमाणेच काँग्रेसच्या पहिल्या यादीत अनेक दिग्गजांची नावे असतील. असे मानले जात आहे की काँग्रेसच्या पहिल्या यादीत पक्षाचे माजी प्रमुख राहुल गांधींचे नाव असेल आणि ते वायनाड येथून निवडणूक लढवू शकतात. सध्या राहुल गांधी वायनाड येथून खासदार आहेत. राहुल गांधींशिवाय पहिल्या यादी ४० नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.



केरळच्या सर्व खासदारांना पुन्हा संधी


ज्या ४० उमेदवारंचा नावे काँग्रेसच्या पहिल्या यादीत येऊ शकतात त्यात तिरूअनंतपुरम येथून शशी थरूर, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघल यांच्या नावावरही चर्चा झाली. या दोन्ही दिग्गजांची नावे पहिल्या यादीत समाविष्ट होऊ शकतात. सूत्रांच्या मते केरळच्या सर्व खासदारांना काँग्रेस पुन्हा एकदा तिकीट देऊ शकते.



या राज्यांमधील उमेदवारांबाबत सहमती


काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत मणिपूर, नागालँड, सिक्कीम आणि मेघालय येथील उमेदवारांबाबत सहमती झाली. यांच्या नावाची घोषणाही पहिल्या यादीत केली जाऊ शकते. केरळ, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि लक्षद्वीप येथील उमेदवारांची नावे फायनल झाली आहेत.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय