Lok Sabha Election 2024: आज येणार काँग्रेसची पहिली यादी! ४० उमेदवारांची असतील नावे, मैदानात राहुल गांधी-शशी थरूर

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने १९५ नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता काँग्रेसही लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यात अनेक नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते.


भाजपप्रमाणेच काँग्रेसच्या पहिल्या यादीत अनेक दिग्गजांची नावे असतील. असे मानले जात आहे की काँग्रेसच्या पहिल्या यादीत पक्षाचे माजी प्रमुख राहुल गांधींचे नाव असेल आणि ते वायनाड येथून निवडणूक लढवू शकतात. सध्या राहुल गांधी वायनाड येथून खासदार आहेत. राहुल गांधींशिवाय पहिल्या यादी ४० नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.



केरळच्या सर्व खासदारांना पुन्हा संधी


ज्या ४० उमेदवारंचा नावे काँग्रेसच्या पहिल्या यादीत येऊ शकतात त्यात तिरूअनंतपुरम येथून शशी थरूर, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघल यांच्या नावावरही चर्चा झाली. या दोन्ही दिग्गजांची नावे पहिल्या यादीत समाविष्ट होऊ शकतात. सूत्रांच्या मते केरळच्या सर्व खासदारांना काँग्रेस पुन्हा एकदा तिकीट देऊ शकते.



या राज्यांमधील उमेदवारांबाबत सहमती


काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत मणिपूर, नागालँड, सिक्कीम आणि मेघालय येथील उमेदवारांबाबत सहमती झाली. यांच्या नावाची घोषणाही पहिल्या यादीत केली जाऊ शकते. केरळ, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि लक्षद्वीप येथील उमेदवारांची नावे फायनल झाली आहेत.

Comments
Add Comment

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर

Bengaluru News : क्रूरतेचा कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फूटेजमुळे उघड

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी,

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)