Congress Candidates List 2024: काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, राहुल गांधी वायनाडमधून लढवणार निवडणूक

  118

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४(loksabha election 2024)पाहता काँग्रेसने(congress) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या ७ मार्चला झालेल्या बैठकीत अनेक मोठी नावे ठरली होती. काँग्रेसने शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत यावर शिक्कामोर्तब केले. काँग्रेस खासदार राहुल गांधी केरळच्या वायनाड येथून लोकसभेसाठी मैदानात उतरत आहेत.


काँग्रेसच्या पहिल्या यादीत ३९ नावे समोर आली आहेत. यात वायनाड येथून राहुल गांधी, तिरूअनंतपुरम येथून शशी थरूर, अलप्पुझा येथून केसी वेणुगोपाल, राजनांदगाव येथून भूपेश बघल, मेघालय येथून विन्सेट पाला आणि त्रिपुरा पश्चिम येथून आशिष साहा यांचे नाव समोर आले आहे. ३९ उमेदवारांच्या यादीत १५ उमेदवार सामान्य विभागातील, तर २४ उमेगदवार मागासवर्ग, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे आहेत.


काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील जागांवरच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. उत्तर प्रदेशात इंडिया गठबंधनअंतर्गत निवडणूक लढवली जात आहे. समाजवादी पक्षाने १७ जागा काँग्रेसला दिल्या आहेत. यात अमेठी, रायबरेली, प्रयागराज, वाराणसी, महाराजगंज, देवरिया, बांसगाव, सीतापूर, अमरोहा, बुलंदशहर, गाझियाबाद, कानपूर, झांसी, बाराबंकी, फतेहपूर सिक्री, सहारनपूर आणि मथुरा यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )