IND vs ENG: धरमशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस करणार का खेळ?

धरमशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे ७ मार्च २०२४ला खेळवला जात आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेत हवामानाची साथ चांगली लाभली. मात्र धरमशाला कसोटीत पावसाचा खेळ रंगू शकतो. खरंतर मालिकेतील शेवटच्या सामन्यात खराब हवामान प्रेक्षकांची मजा किरकिरी करू शकतो. असे सांगितले जात आहे की पहिल्या दिवशी खराब हवामान खेळ खराब करू शकतो.


डोंगरांनी व्यापलेल्या धरमशालामध्ये तापमान खूप घसरले आहे. येथे गेल्या आठवड्यात बर्फवृष्टी पाहायला मिळाली. अशातच ही बर्फवृष्टी सामन्यात व्यत्यय आणू शकते. बर्फवृष्टीशिवाय पाऊसही सामन्यात शत्रू बनू शकतो. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिवसाच्या सुरूवातीपासूनच आकाशात पावसाचे ढग असतील.


दुपारी १२च्या सुमारास पाऊस येण्याची शक्यता आहे. यानंतर ३ तासापर्यंत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. अशातच पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ खराब होऊ शकतो.



टीम इंडियाचा मालिकाविजय


चार सामन्यांमध्ये भारताने आधीच मालिका विजय मिळवला आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील चारपैकी ३ सामने जिंकल्याने त्यांच्याकडे ३-१ अशी विजयी आघाडी आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडचा ५० धावांनी विजय

शिवम दुबेची तुफानी खेळी व्यर्थ शाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) चे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली आणि दुःखद

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली