IND vs ENG: धरमशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस करणार का खेळ?

  54

धरमशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे ७ मार्च २०२४ला खेळवला जात आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेत हवामानाची साथ चांगली लाभली. मात्र धरमशाला कसोटीत पावसाचा खेळ रंगू शकतो. खरंतर मालिकेतील शेवटच्या सामन्यात खराब हवामान प्रेक्षकांची मजा किरकिरी करू शकतो. असे सांगितले जात आहे की पहिल्या दिवशी खराब हवामान खेळ खराब करू शकतो.


डोंगरांनी व्यापलेल्या धरमशालामध्ये तापमान खूप घसरले आहे. येथे गेल्या आठवड्यात बर्फवृष्टी पाहायला मिळाली. अशातच ही बर्फवृष्टी सामन्यात व्यत्यय आणू शकते. बर्फवृष्टीशिवाय पाऊसही सामन्यात शत्रू बनू शकतो. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिवसाच्या सुरूवातीपासूनच आकाशात पावसाचे ढग असतील.


दुपारी १२च्या सुमारास पाऊस येण्याची शक्यता आहे. यानंतर ३ तासापर्यंत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. अशातच पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ खराब होऊ शकतो.



टीम इंडियाचा मालिकाविजय


चार सामन्यांमध्ये भारताने आधीच मालिका विजय मिळवला आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील चारपैकी ३ सामने जिंकल्याने त्यांच्याकडे ३-१ अशी विजयी आघाडी आहे.

Comments
Add Comment

टी-२० वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने अचानक केली निवृत्तीची घोषणा

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

"१८ वर्षापूर्वीचं का उकरून काढलं?" थप्पड कांड व्हिडिओ लिकने भज्जी संतापला

नवी दिल्ली: ललित मोदी यांनी मायकेल क्लास यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आयपीएल २००८ च्या हंगामात गाजलेल्या

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय

रोहित शर्मासह ६ क्रिकेटपटूंची सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार

बंगळुरु : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

टी-२० विश्वचषक २०२६ साठी महेंद्रसिंग धोनी पुन्हा टीम इंडियाचा 'मेंटॉर'? बीसीसीआयने दिली ऑफर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडियाच्या मेंटरपदाची