विचारपूर्वक विधाने करा, राहुल गांधींना निवडणूक आयोगाचा सल्ला

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींना सल्ला दिला आहे की त्यांनी विचारपूर्व विधाने करावीत.निवडणूक आयोगाने राहुल गांधींसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानजनक विधाने केली होती.


लवकर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचाराला सुरूवात करतील. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींसाठी खास दिशानिर्देश जाहीर करण्यात आले आहेत.


यात त्यांना निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारची विधाने करताना ती विचारपूर्वक करावीत, वादग्रस्त टीकाटिप्पणी करू नये असा सल्ला दिला आहे. हे दिशानिर्देश १ मार्चला जारी करण्यात आले होते. यात निवडणूक आयोगाने सूचना दिली होती की पक्ष, उमेदवार तसेच स्टार प्रचारकांनी कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.


यात असेही म्हटले आहे की ज्या स्टार प्रचारक तसेच उमेदवारांना आधीच नोटीस मिळाली आहे त्यांनी पुन्हा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईला सामोले जावे लागू शकते.

Comments
Add Comment

Air India Plane : एअर इंडियाचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India) च्या विमानासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून अमृतसरकडे जाणारे

Indian Passport : पासपोर्टधारकांसाठी महत्त्वाची बातमी; MEA ने नागरिकत्वाबाबत दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट (Indian Passport) हा नागरिकत्वाचा (Citizenship) पुरावा नसून तो केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (International Travel)

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.