Bhandara News : भंडाऱ्याच्या बळीराम गौशाळेत चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू!

निर्दयी अवस्थेत जनावरांना ठेवलं होतं बांधून


भंडारा : भंडाऱ्याच्या (Bhandara news) पवनी येथील बळीराम गौशाळेतून (Baliram cowshed) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू (Animals dead) झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीतील (Gadchiroli) कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरीतील बळीराम गौशाळेत पाठवलं होतं. मात्र, बळीराम गौशाळेत चारा आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने ३० जनावरे मृत पावली. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे.


गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करुन भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत त्यांना पाठवलं होतं. मात्र, गौशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचं शेड नव्हतं. त्यामुळे ही सर्व जनावरे निर्दयीपणे उघड्यावर ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दरम्यान, यातील ३० जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी समोर आली.


विशेष बाब म्हणजे, मागील वर्षी बळीराम गौशाळेच्या अध्यक्षांसह १३ संचालकांवर गौशाळेतील जनावरे विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या गौशाळेकडून गुन्हा घडला आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य