Bhandara News : भंडाऱ्याच्या बळीराम गौशाळेत चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू!

निर्दयी अवस्थेत जनावरांना ठेवलं होतं बांधून


भंडारा : भंडाऱ्याच्या (Bhandara news) पवनी येथील बळीराम गौशाळेतून (Baliram cowshed) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू (Animals dead) झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीतील (Gadchiroli) कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरीतील बळीराम गौशाळेत पाठवलं होतं. मात्र, बळीराम गौशाळेत चारा आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने ३० जनावरे मृत पावली. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे.


गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करुन भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत त्यांना पाठवलं होतं. मात्र, गौशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचं शेड नव्हतं. त्यामुळे ही सर्व जनावरे निर्दयीपणे उघड्यावर ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दरम्यान, यातील ३० जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी समोर आली.


विशेष बाब म्हणजे, मागील वर्षी बळीराम गौशाळेच्या अध्यक्षांसह १३ संचालकांवर गौशाळेतील जनावरे विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या गौशाळेकडून गुन्हा घडला आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा