Benefits Of Dates: दररोज २ खजूर खाण्याची लावा सवय, हे आजार राहतील दूर

मुंबई: आजच्या वेगवान लाईफस्टाईलमध्ये स्वत:ला हेल्दी आणि फिट राखणे खरंच आव्हानात्मक आहे. वेळेच्या अभावामुळे अनेकदा एक्सरसाईज अथवा योगा करता येत नाही. अशातच अनेक लोक विविध पद्धती शोधून काढतात. आरोग्य चांगले राहावे यासाठी डाएटिंगच्याही अनेक पद्धतीही शोधून काढतात.


तज्ञ म्हणतात की जर दिवसाची सुरूवात खजूराने केली तर तुम्ही नेहमी फिट राहाल. खजुरामध्ये अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे कॅन्सरसारखे आजार दूर राहतात. हृदयाच्या आरोग्यासाठी खजूर चांगले मानले जाते. याच्या वापराने बद्धकोष्ठता, मेटाबॉलिज्म, वजनासारख्या समस्या येतात. जाणून घ्या खजूर खाण्याची योग्य वेळ आणि याचे फायदे.


खजूर हे असे फळ आहे. यात अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असते. आर्यन, फोलेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटामिन बी ६ सारखी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे अनेक प्रकारचे आजार दूर होतात.


खजुरामध्ये फ्रुक्टोज आढळते. जर रिकाम्या पोटी खजूराचे सेवन करता तर पोट खराब होऊ शकते. भरलेल्या पोटाने खजूर खाणेही चांगले नसते. कारण जेवण जेवल्यानंतर पोट भरलेले राहते आणि खजुरामध्ये आढळणारे फायबर पाचन क्रियाची समस्या वाढू शकते. यामुळे सूजेचा त्रास होऊ शकतो.


खजूर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये अथवा दिवसभर कधीही खाऊ शकता. सकाळी-सकाळी खजूर खाल्ल्याने एनर्जी मिळते. यामुळे आतड्यामधील किडे मरून जाऊ शकतात.सकाळी खजूर खाल्ल्याने शरीराच्या काही भागांची सफाई चांगल्या पद्धतीने होते. हृदय आणि लिव्हरचे आरोग्य सुधारते. खजुरामध्ये आढळले जाणारे अँटीऑक्सिडंट चेहऱ्याची चमक वाढते तसेच केसांचे वयही वाढते. तसेच अनेक फायदेही मिळतात.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी