नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण सोमवार, दि. ४ मार्च रोजी होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा असून, सकाळी ११ वाजता इगतपुरी पथकर प्लाझा, मौजे नांदगाव सदो, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण होणार आहे.
या तिसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील २४.८७२ कि.मी लांबी एकूण १६ गावांतून जात असून पॅकेज १३ अंतर्गत २३.२५१ कि.मी. व पॅकेज १४ अंतर्गत १.६२१ कि.मी लांबीचा समावेश आहे.
या टप्प्यात पॅकेज १३ अंतर्गत १ व्हायाडक्ट (२०० मी. लांबी), दारणा नदीवरील १ मोठा पूल (४५० मी.), ८ छोटे पूल, वाहनांसाठी ५ भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी ८ भुयारी मार्ग, ९ ओव्हरपास, पथकर प्लाझावरील ४ इंटरचेज, १४ टोलबूथ, २ वे-ब्रिज, १ टनेल-२७५ मी, २७ बॉक्स कल्वर्ट, २७ युटीलीटी डक्ट व पॅकेज १४ अंतर्गत १ व्हायाडक्ट (९१० मी. लांबी), आदी सुविधांचा समावेश आहे.
प्रकल्पाच्या या तिसऱ्या टप्प्याचा खर्च रुपये १०७८ कोटी असून या टप्प्याच्या लोकार्पणामुळे ७०१ कि.मी.पैकी आता एकूण ६२५ कि.मी. लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झालेला आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतिपथावर आहे. इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल व १ तासात शिर्डीला पोहोचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…