Chandrakant Patil : ...तर त्या विद्यापीठांची मान्यता काढून घेणार!

चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा


नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आनंदशाळा समारंभाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते झाले उद्घाटन करण्यात आले. केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण संस्थाचालकांना एक इशारा दिला. नवीन शैक्षणिक धोरणाची (New Education Policy) जूनपासून जे अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेणार, असं ते म्हणाले. तुम्ही सुधरा, दम देत नाही पण प्रेमाचा सल्ला समजा, असंही त्यांनी म्हटलं आहे.



सुधरा नाहीतर कॉलेजेस बंद करा


चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यात फ्लेम युनिव्हर्सिटीत १३ लाख वार्षिक फी आहे, ऍडमिशन मिळत नाही तिथे माझ्यासारख्याची चिट्ठी द्यावी लागते, ऐकत नाहीत. मालक शहा माझे मित्र आहेत. त्यांनी १०० एकरात ८०० कोटी रुपये खर्च केले आहे. मुलींना मोफत शिक्षणाबाबत कॅबिनेट निर्णय झाला आहे. आता जी आर निघेल. तुम्ही सुधरा, सुधारा नाही म्हणत सुधरा म्हणतोय जरा ग्रामीण भागातला शब्द आहे. सुधरा नाहीतर कॉलेजेस बंद करा, असं त्यांनी म्हटलं.



त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेईल


पुढे ते म्हणाले, जूनमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाला पर्याय नाही. ज्यांना या धोरणाची जूनपासून अंमलबजावणी करायची नसेल त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ज्या विद्यापीठाला ममता बॅनर्जींसारखे बंड वाटत असेल, आम्ही करणार नाही, अशी त्यांची भूमिका असेल तर त्या विद्यापीठाची मान्यता रद्द होईल. आम्ही दम देत नाही, प्रेमाचा ग्रामीण तरुण म्हणून सल्ला देतोय, असे त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्र चालकांना दरमहा अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री छगन भुजबळ यांचे विधान परिषदेत आश्वासन

बंद शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य; निधीसाठी अर्थ विभागाशी चर्चा करणार मुंबई : राज्यातील

Maharashtra Monsoon 2026 : राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण