T20 World Cup: वर्ल्डकपसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? तारीख ठेवा लिहून

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४साठी(t-20 world cup 2024) टीम इंडियाची(team india) घोषणा कधी होणार? याबाबत अनेक चाहते उत्सुक आहेत. यावेळेस वर्ल्डकपचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत आहे. भारतीय संघाने आपल्या अभियानाची सुरूवात ५ जूनला आयर्लंडविरुद्ध करणार आहे तर दुसऱ्याच सामन्यात ९ जूनला ते पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळतील.


भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकपचा खिताब जिंकन ११ वर्षे झाली आहेत. अशातच भारतीय संघ हा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आयसीसीच्या या प्रतिष्ठित स्पर्धेची सुरूवात १ जूनपासून होईल.


बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार टी-२० वर्ल्डकप २०२४साठी भारतीय संघाची घोषणा १ मेला होऊ शकते.दरम्यान, वर्ल्डकपसाठी संघ घोषणेची शेवटची तारीख काय आहे याबाबत आयसीसीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.


रिपोर्टनुसार १५ सदस्यीय संघाच्या घोषणेची तारीख १ मे असू शकते. २५ मे पर्यंत संघात बदल करण्याची वेळ दिली जाईल. दरम्यान, यासाठी आयसीसीच्या टेक्निकल कमिटीकडून अप्रूव्हल घ्यावे लागते.



बीसीसीआय सचिव जय शाह यांना ट्रॉफी जिंकण्याची आशा


बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतेच म्हटले होते की मला आशा आहे की भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात यावेळेस वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी ठरतील. जय शाह यांनी इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी झालेल्या कार्यक्रमात म्हटले होते, आम्ही २०२३च्या वर्ल्डकप फायनलमध्ये भले हरलो असलो तरी सलग १० सामने जिंकत प्रेक्षकांची मने जिंकली. मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही २०२४ टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृ्तवात बारबाडोसमध्ये भारताचा झेंडा रोवणार.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख