T20 World Cup: वर्ल्डकपसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? तारीख ठेवा लिहून

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४साठी(t-20 world cup 2024) टीम इंडियाची(team india) घोषणा कधी होणार? याबाबत अनेक चाहते उत्सुक आहेत. यावेळेस वर्ल्डकपचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत आहे. भारतीय संघाने आपल्या अभियानाची सुरूवात ५ जूनला आयर्लंडविरुद्ध करणार आहे तर दुसऱ्याच सामन्यात ९ जूनला ते पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळतील.


भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकपचा खिताब जिंकन ११ वर्षे झाली आहेत. अशातच भारतीय संघ हा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आयसीसीच्या या प्रतिष्ठित स्पर्धेची सुरूवात १ जूनपासून होईल.


बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार टी-२० वर्ल्डकप २०२४साठी भारतीय संघाची घोषणा १ मेला होऊ शकते.दरम्यान, वर्ल्डकपसाठी संघ घोषणेची शेवटची तारीख काय आहे याबाबत आयसीसीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.


रिपोर्टनुसार १५ सदस्यीय संघाच्या घोषणेची तारीख १ मे असू शकते. २५ मे पर्यंत संघात बदल करण्याची वेळ दिली जाईल. दरम्यान, यासाठी आयसीसीच्या टेक्निकल कमिटीकडून अप्रूव्हल घ्यावे लागते.



बीसीसीआय सचिव जय शाह यांना ट्रॉफी जिंकण्याची आशा


बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतेच म्हटले होते की मला आशा आहे की भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात यावेळेस वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी ठरतील. जय शाह यांनी इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी झालेल्या कार्यक्रमात म्हटले होते, आम्ही २०२३च्या वर्ल्डकप फायनलमध्ये भले हरलो असलो तरी सलग १० सामने जिंकत प्रेक्षकांची मने जिंकली. मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही २०२४ टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृ्तवात बारबाडोसमध्ये भारताचा झेंडा रोवणार.

Comments
Add Comment

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा