T20 World Cup: वर्ल्डकपसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? तारीख ठेवा लिहून

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४साठी(t-20 world cup 2024) टीम इंडियाची(team india) घोषणा कधी होणार? याबाबत अनेक चाहते उत्सुक आहेत. यावेळेस वर्ल्डकपचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत आहे. भारतीय संघाने आपल्या अभियानाची सुरूवात ५ जूनला आयर्लंडविरुद्ध करणार आहे तर दुसऱ्याच सामन्यात ९ जूनला ते पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळतील.


भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकपचा खिताब जिंकन ११ वर्षे झाली आहेत. अशातच भारतीय संघ हा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आयसीसीच्या या प्रतिष्ठित स्पर्धेची सुरूवात १ जूनपासून होईल.


बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार टी-२० वर्ल्डकप २०२४साठी भारतीय संघाची घोषणा १ मेला होऊ शकते.दरम्यान, वर्ल्डकपसाठी संघ घोषणेची शेवटची तारीख काय आहे याबाबत आयसीसीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.


रिपोर्टनुसार १५ सदस्यीय संघाच्या घोषणेची तारीख १ मे असू शकते. २५ मे पर्यंत संघात बदल करण्याची वेळ दिली जाईल. दरम्यान, यासाठी आयसीसीच्या टेक्निकल कमिटीकडून अप्रूव्हल घ्यावे लागते.



बीसीसीआय सचिव जय शाह यांना ट्रॉफी जिंकण्याची आशा


बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतेच म्हटले होते की मला आशा आहे की भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात यावेळेस वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी ठरतील. जय शाह यांनी इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी झालेल्या कार्यक्रमात म्हटले होते, आम्ही २०२३च्या वर्ल्डकप फायनलमध्ये भले हरलो असलो तरी सलग १० सामने जिंकत प्रेक्षकांची मने जिंकली. मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही २०२४ टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृ्तवात बारबाडोसमध्ये भारताचा झेंडा रोवणार.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय