Loksabha election: भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी की जुन्या चेहऱ्यांना पुन्हा पसंती, लोकसभा निवडणुकीत कोण असणार उमेदवार?

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. भाजप लवकरच आपल्या उमेदवारांची नावे फायनल करत आहे. पहिल्या उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा सारेच जण करत आहे. गुरूवारी भाजपच्या बऱ्याच वेळ बैठका पार पडलाय. विविध राज्यांतील नेत्यांसोबत या बैठकीमध्ये बातचीत करण्यात आली.


आधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोन तास बैठक सुरू होती. ही बैठक संध्याकाळी ७ वाजता सुरू झाली. यानंतर भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ४ तास विचारमंथन करण्यात आले. भाजपच्या मुख्यालयात रात्री ११ वाजल्यापासून ३ वाजेपर्यंत जागांवर चर्चा केली जात होती.


या दोन्ही बैठकींमध्ये पहिल्या यादीला अंतिम रूप देण्याबाबत विचार करण्यात आला. खास बाब म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या हाती नेतृत्व घेतले आहे. त्यांनी गुरूवारी संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधान निवासस्थानी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मोठी बैठक केली. यानंतर ते भाजप मुख्यालयात पोहोचले. येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूपेंद्र यादवह अनेक राज्यातून आलेले नेते उपस्थित होते. दरम्यान, सगळ्यांच्या नजरा याकडेच आहेत की पक्ष या निवडणुकीत जुन्या नेत्यांचे तिकीट कापणा की आपल्या उमेदवारांच्या निवडीत काही नवे प्रयोग करणार. दरम्यान, यावेळेस नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.


आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकभा निवडणुकीच्या घोषणेआधी भाजप उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील कमकुवत जागेवर आपल्या उमेदवाराची घोषणा करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार २०१९च्या निवडणुकीत भाजपला ज्या जागांवर अपयश मिळाले होते तेथे संघटन मजबूत करण्याच्या दिशेने काम केले जात आहे. केंद्रीय मंत्र्यांची टीम ग्राऊंडला उतरवण्यात आली होती.

Comments
Add Comment

बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की