नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. भाजप लवकरच आपल्या उमेदवारांची नावे फायनल करत आहे. पहिल्या उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा सारेच जण करत आहे. गुरूवारी भाजपच्या बऱ्याच वेळ बैठका पार पडलाय. विविध राज्यांतील नेत्यांसोबत या बैठकीमध्ये बातचीत करण्यात आली.
आधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोन तास बैठक सुरू होती. ही बैठक संध्याकाळी ७ वाजता सुरू झाली. यानंतर भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ४ तास विचारमंथन करण्यात आले. भाजपच्या मुख्यालयात रात्री ११ वाजल्यापासून ३ वाजेपर्यंत जागांवर चर्चा केली जात होती.
या दोन्ही बैठकींमध्ये पहिल्या यादीला अंतिम रूप देण्याबाबत विचार करण्यात आला. खास बाब म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या हाती नेतृत्व घेतले आहे. त्यांनी गुरूवारी संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधान निवासस्थानी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मोठी बैठक केली. यानंतर ते भाजप मुख्यालयात पोहोचले. येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूपेंद्र यादवह अनेक राज्यातून आलेले नेते उपस्थित होते. दरम्यान, सगळ्यांच्या नजरा याकडेच आहेत की पक्ष या निवडणुकीत जुन्या नेत्यांचे तिकीट कापणा की आपल्या उमेदवारांच्या निवडीत काही नवे प्रयोग करणार. दरम्यान, यावेळेस नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकभा निवडणुकीच्या घोषणेआधी भाजप उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील कमकुवत जागेवर आपल्या उमेदवाराची घोषणा करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार २०१९च्या निवडणुकीत भाजपला ज्या जागांवर अपयश मिळाले होते तेथे संघटन मजबूत करण्याच्या दिशेने काम केले जात आहे. केंद्रीय मंत्र्यांची टीम ग्राऊंडला उतरवण्यात आली होती.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…