Green Tea: एका दिवसात किती ग्रीन टी प्यावी, घ्या जाणून

मुंबई: आजकाल ग्री टी आपल्या किचनमधील महत्त्वाचा घटक बनली आहे. खासकरून ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी. यामुळे केवळ फ्रेशच वाटत नाही तर आपले शरीर आतून साफ होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये पोषक गुण आपल्या शरीराला स्वस्थ राखण्यासोबतच वजन घटवण्यातही मदत करतात.


आरोग्य तज्ञांच्या मते संपूर्ण दिवसभरात २ ते ३ कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. इतक्या प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने त्याचे फायदे मिळतात आणि नुकसान होत नाही. ग्रीन टीमध्ये अनेक प्रकारचे चांगले तत्व असतात जे आपल्या शरीराला स्वस्थ राखतात.


यामुळे हृदय मजबूत बनते. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच यामुळे फ्रेशही वाटते. यामुळे दररोज प्रमाणात ग्रीन टी प्यावी. ज्यामुळे आरोग्य चांगले राहील. अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केल्यास याचे नुकसानही होऊ शकते. सगळ्यात आधी ग्रीन टीमध्ये कॅफेन असते. आपण जर अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केले तर शरीरात कॅफेनचे प्रमाण वाढते. यामुळे झोप न येणे, चिडचिडेपणा, डोकेदुखी, तसेच हृदयाचे ठोके वाढतात.


दुसरा म्हणजे ग्रीन टीमध्ये टॅनिन असते जे आयर्नचे शोषण कमी करते. याचा अर्थ जर आपण जेवणानंतर लगेचच ग्रीन टी प्यायलो कर शरीरात जेवणातून मिळणारे आर्यन योग्य प्रमाणात मिळत नाही. यामुळे रक्ताची कमतरता होऊ शकते.


ग्रीन टी अधिक प्यायल्याने पोटदुखी तसेच अपचनाची समस्या जाणवू शकते. कारण ग्रीन टी अॅसिडिटी वाढवू शकते. यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका