Green Tea: एका दिवसात किती ग्रीन टी प्यावी, घ्या जाणून

Share

मुंबई: आजकाल ग्री टी आपल्या किचनमधील महत्त्वाचा घटक बनली आहे. खासकरून ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी. यामुळे केवळ फ्रेशच वाटत नाही तर आपले शरीर आतून साफ होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये पोषक गुण आपल्या शरीराला स्वस्थ राखण्यासोबतच वजन घटवण्यातही मदत करतात.

आरोग्य तज्ञांच्या मते संपूर्ण दिवसभरात २ ते ३ कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. इतक्या प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने त्याचे फायदे मिळतात आणि नुकसान होत नाही. ग्रीन टीमध्ये अनेक प्रकारचे चांगले तत्व असतात जे आपल्या शरीराला स्वस्थ राखतात.

यामुळे हृदय मजबूत बनते. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच यामुळे फ्रेशही वाटते. यामुळे दररोज प्रमाणात ग्रीन टी प्यावी. ज्यामुळे आरोग्य चांगले राहील. अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केल्यास याचे नुकसानही होऊ शकते. सगळ्यात आधी ग्रीन टीमध्ये कॅफेन असते. आपण जर अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केले तर शरीरात कॅफेनचे प्रमाण वाढते. यामुळे झोप न येणे, चिडचिडेपणा, डोकेदुखी, तसेच हृदयाचे ठोके वाढतात.

दुसरा म्हणजे ग्रीन टीमध्ये टॅनिन असते जे आयर्नचे शोषण कमी करते. याचा अर्थ जर आपण जेवणानंतर लगेचच ग्रीन टी प्यायलो कर शरीरात जेवणातून मिळणारे आर्यन योग्य प्रमाणात मिळत नाही. यामुळे रक्ताची कमतरता होऊ शकते.

ग्रीन टी अधिक प्यायल्याने पोटदुखी तसेच अपचनाची समस्या जाणवू शकते. कारण ग्रीन टी अॅसिडिटी वाढवू शकते. यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.

Tags: green tea

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago