मार्केटिंग विभागाच्या डुलक्या सिडकोच्या अंगलट

Share

घर खरेदीसाठी अधिवास पत्राची गरज नसल्याचे पुस्तिकेत नमूद

अधिवास पत्र बंधनकारक असल्याचे सिडकोने केले स्पष्ट

नवी मुंबई(प्रतिनिधी) : महाराष्ट्रात घर घ्यायचं असेल तर महाराष्ट्रात किमान १५ वर्षे अधिवासाचा पुरावा (डोमिसाईल प्रमाणपत्र) सादर करणे घर खरेदीदाराला बंधनकारक आहे. असे असताना सिडकोच्या मार्केटिंग विभागातील अधिकारी-कर्मचाऱयांनी कामावर काढलेल्या डुलक्यांमुळे सिडकोने नुकत्याच जाहीर केलेल्या गृहनिर्माण योजना (जानेवारी २०२४) पुस्तिकेमध्ये महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्राची गरज नसल्याचे नमूद केल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मार्केटिंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतची चूक लपवण्यासाठी सदर प्रकाराला टायपो एररचे नाव देऊन स्वतची कातडी बचावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आता सिडकोच्या महागृहनिर्माण योजना जानेवारी – २०२४ मधील सदनिकांकरिता अर्ज करणाऱ्या ग्राहकांना महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याचे सिडकोतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

सिडकोच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या सदर योजनेच्या माहितीपुस्तिकेत अनावधानाने अल्प उत्पन्न गट/ सर्वसाधारण गटासाठी महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही असे टंकलिखित झाले असल्याचे सिडकोने प्रसारमाध्यमांना कळविले आहे.

सिडकोतर्फे २६ जानेवारी २०२४ रोजी महागृहनिर्माण योजना जानेवारी – २०२४ जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत एकूण ३,३२२ सदनिका प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटक आणि सर्वसाधारण गटातील नागरिकांकरिता द्रोणागिरी आणि तळोजा नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago