Gajanan Maharaj : भक्त प्रतिपालक श्री गजानन महाराज


  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला


आवाजावरून मी त्यांना थोडेफार ओळखू शकलो. (कारण त्यांनी माझा फोन व खिशातील रक्कम काढताना माझ्या कानाजवळ बोलून मला तसे सूचित केले होते). ५-७ दिवस आयसीयूमध्ये राहून मी थोडा ठीक झालो. अकोला येथे घरी आल्यावर फिजिओथेरपी, मसाज, व्यायाम आणि औषधोपचार झाल्यावर मी खडखडीत बरा झालो. या सर्व काळात माझ्या आजारी असलेल्या आईला अमरावती येथे आणणे शक्य नव्हते. तिची समजूत घालण्याकरिता माझे मामा डॉ. सावदेकर हे अकोला येथील माझ्या घरी जावून आले व माझ्या आईची समजूत घातली. तसेच मला काहीच झालेले नाही, असा धीर देऊन तिचे सांत्वन केले. या सर्व दिवसांमध्ये माझी आई नित्यनियमाने श्री गुरू दत्तात्रयांचे घोर कष्टोद्धारण स्तोत्र पठण करीत असे. ही झाली माझ्या जीवनात घडलेली एक अनुभूती. आता येथे प्रश्न निर्माण होतो की, त्यादिवशी गाडीत धोतर आणि अंगरखा घातलेली वृद्ध व्यक्ती कोण? इतक्या रात्री “आज थंडी खूप आहे बाबा”, अशी जाणीव त्यांनी मला का बरे करून दिली असावी?



आरक्षणाच्या डब्यात अवचित आलेली आणि मला बघून माझी काळजी घेणारी व्यक्ती कशी आली?, की ज्यांनी अमरावतीपर्यंत माझी काळजी तर घेतलीच, पण त्यासोबतच “आपले अमरावती येथे कोणी नसेल तरीही काळजी करू नका. मी स्वतः यांना दवाखान्यात दाखल करेन व आपण लोक येईतोवर काळजी घेईन”, असा प्रेमपूर्वक दिलासा देखील दिला. दुसऱ्या दिवशी हे सद्गृहस्थ मला भेटावयास सुयश हॉस्पिटल येथे आले. त्यावेळी माझ्या खिशामधून काढलेली रक्कम, भ्रमणध्वनी भावास परत केला. माझा दृढ विश्वास या गोष्टीची निश्चिती पटवतो की, माझी ही सर्व व्यवस्था श्री गजानन महाराजांनीच लावून दिली आणि माझी तब्येत एकदम ठीक केली. श्री महाराजांची आणि श्री मारुतीराया यांची कृपाच मला या जीवघेण्या संकटातून वाचविण्यास कारणीभूत आहे. (क्रमश:)


Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा