जामनगर : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा आणि उद्योगपती अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनची सुरुवात अन्नदानाने झाली. अंबानी कुटुंबाचे होमटाऊन असलेल्या जामनगरमधील रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसह अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनी गावकऱ्यांना पारंपारिक गुजराती जेवण दिले. राधिकाची आजी आणि आई-वडील वीरेन आणि शैला मर्चंट यांनी देखील अन्नसेवेत (Food donation) भाग घेतला.
अन्नदानाच्या कार्यक्रमात सुमारे ५१ हजार स्थानिक रहिवाशांना जेवण दिले जाणार आहे. पुढील काही दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्यांसाठी स्थानिक समुदायाचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबानी कुटुंबाने अन्नसेवा आयोजित केली आहे. भोजनानंतर उपस्थितांनी पारंपरिक लोकसंगीताचा आस्वाद घेतला. सुप्रसिद्ध गुजराती गायक कीर्तिदान गढवी यांनी आपल्या गायनाने या कार्यक्रमात रंगत आणली.
अन्नदान कार्यक्रमात राधिका आणि अनंत यांना गावकऱ्यांकडून खूप आशीर्वाद मिळाले. लोकांनी त्याला भेटवस्तूही दिल्या. त्याचवेळी अनंत आणि राधिका यांनीही सर्वांचे मोकळेपणाने स्वागत केले. हात जोडून प्रणाम केला आणि स्वतःच्या हाताने जेवणही दिले.
अंबानी कुटुंबात जेवण देण्याची परंपरा जुनी आहे. अंबानी कुटुंब शुभ कौटुंबिक प्रसंगी भोजन देते. कोरोना महामारीच्या काळात देश संकटात असतानाही अनंत अंबानी यांच्या आई नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाऊंडेशनने जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम राबवला. कौटुंबिक परंपरेला पुढे नेत अनंत अंबानी यांनी त्यांच्या लग्नाआधीची कार्ये अण्णा सेवेसोबत सुरू केली आहेत.
परीक्षेत नव्या विषयाची पडणार भर; तारखा जाहीर मुंबई : यूजीसी नेटचा पेपर (UGC NET Exam)…
दोन मुली व एक महिला गंभीर जखमी पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात (Pune Porsche Accident)…
मुंबई : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची…
पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…
ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…
रवींद्र तांबे केंद्रात सरकार स्थापन झाले की, सर्वांचे लक्ष लागलेले असते ते म्हणजे देशाच्या केंद्रीय…