राज्यसभेच्या १५ जागांसाठी ३ राज्यांमध्ये आज मतदान

नवी दिल्ली: देशात ३ राज्यांमध्ये १५ राज्यसभा जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. असे राज्य जिथे मतदान होत आहे त्यात उत्तर प्रदेशच्या १०, कर्नाटकच्या ४ आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेचा समावेश आहे.


खरंतर, १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५६ जागा रिकामी आहे. यातील १२ राज्यातील ४१ राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले आहे. या राज्यसभेच्या जागेसाठीचे मतदान सकाळी ९ वाजता सुरू होईल ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू असेल. यानंतर संध्याकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. तर रात्री याचे निकाल येण्याची शक्यता आहे.


राज्यसभेसाठी खरा मुकाबला उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पाहायला मिळू शकतो. कारण येथील एका एका जागेसाठी चुरस असणार आहे. उत्तर प्रदेशातील १० जागांसाठी ११ उमेदवार तर कर्नाटकच्या ४ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. हिमाचल प्रदेशातील १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत मात्र येथे काँग्रेसकडे संख्याबळ असल्याने येथे सामना तितका चुरशीचा नसेल.


कुठून कोणते उमेदवार मैदानात?


उत्तर प्रदेश- या राज्यात एकूण ११ उमेदवार आहेत. भाजपकडून सुधांशु त्रिवेदी, आरपीएन सिंह, अमरपाल मौर्या, तेजपाल सिंह, नवीन जैन, साधना सिंह, संगीता बलवंत आणि संजय सेठ आहे. तर समाजवादी पक्षाने जया बच्चन, आलोक रंजन आणि रामजी लाल सुमन यांना मैदानात उतरवले आहे.


कर्नाटक - कर्नाटकात एकूण ५ उमेदवार आहेत. काँग्रेसकडून अजय माकन, सय्यद नासीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर मैदानात आहेत. भाजपकडून नारायण सा भांडले तर जेडीएसे कुपेंद्र रेड्डी यांना उतरवले आहे.


हिमाचल प्रदेश - येथे एकूण २ उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेसने अभिषेक मनु सिंघवी यांना उमेदवार केले आहे तर भाजपकडून हर्ष महाजन रिंगणात आहेत.

Comments
Add Comment

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट