राज्यसभेच्या १५ जागांसाठी ३ राज्यांमध्ये आज मतदान

नवी दिल्ली: देशात ३ राज्यांमध्ये १५ राज्यसभा जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. असे राज्य जिथे मतदान होत आहे त्यात उत्तर प्रदेशच्या १०, कर्नाटकच्या ४ आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेचा समावेश आहे.


खरंतर, १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५६ जागा रिकामी आहे. यातील १२ राज्यातील ४१ राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले आहे. या राज्यसभेच्या जागेसाठीचे मतदान सकाळी ९ वाजता सुरू होईल ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू असेल. यानंतर संध्याकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. तर रात्री याचे निकाल येण्याची शक्यता आहे.


राज्यसभेसाठी खरा मुकाबला उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पाहायला मिळू शकतो. कारण येथील एका एका जागेसाठी चुरस असणार आहे. उत्तर प्रदेशातील १० जागांसाठी ११ उमेदवार तर कर्नाटकच्या ४ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. हिमाचल प्रदेशातील १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत मात्र येथे काँग्रेसकडे संख्याबळ असल्याने येथे सामना तितका चुरशीचा नसेल.


कुठून कोणते उमेदवार मैदानात?


उत्तर प्रदेश- या राज्यात एकूण ११ उमेदवार आहेत. भाजपकडून सुधांशु त्रिवेदी, आरपीएन सिंह, अमरपाल मौर्या, तेजपाल सिंह, नवीन जैन, साधना सिंह, संगीता बलवंत आणि संजय सेठ आहे. तर समाजवादी पक्षाने जया बच्चन, आलोक रंजन आणि रामजी लाल सुमन यांना मैदानात उतरवले आहे.


कर्नाटक - कर्नाटकात एकूण ५ उमेदवार आहेत. काँग्रेसकडून अजय माकन, सय्यद नासीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर मैदानात आहेत. भाजपकडून नारायण सा भांडले तर जेडीएसे कुपेंद्र रेड्डी यांना उतरवले आहे.


हिमाचल प्रदेश - येथे एकूण २ उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेसने अभिषेक मनु सिंघवी यांना उमेदवार केले आहे तर भाजपकडून हर्ष महाजन रिंगणात आहेत.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या