राज्यसभेच्या १५ जागांसाठी ३ राज्यांमध्ये आज मतदान

नवी दिल्ली: देशात ३ राज्यांमध्ये १५ राज्यसभा जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. असे राज्य जिथे मतदान होत आहे त्यात उत्तर प्रदेशच्या १०, कर्नाटकच्या ४ आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेचा समावेश आहे.


खरंतर, १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५६ जागा रिकामी आहे. यातील १२ राज्यातील ४१ राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले आहे. या राज्यसभेच्या जागेसाठीचे मतदान सकाळी ९ वाजता सुरू होईल ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू असेल. यानंतर संध्याकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. तर रात्री याचे निकाल येण्याची शक्यता आहे.


राज्यसभेसाठी खरा मुकाबला उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पाहायला मिळू शकतो. कारण येथील एका एका जागेसाठी चुरस असणार आहे. उत्तर प्रदेशातील १० जागांसाठी ११ उमेदवार तर कर्नाटकच्या ४ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. हिमाचल प्रदेशातील १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत मात्र येथे काँग्रेसकडे संख्याबळ असल्याने येथे सामना तितका चुरशीचा नसेल.


कुठून कोणते उमेदवार मैदानात?


उत्तर प्रदेश- या राज्यात एकूण ११ उमेदवार आहेत. भाजपकडून सुधांशु त्रिवेदी, आरपीएन सिंह, अमरपाल मौर्या, तेजपाल सिंह, नवीन जैन, साधना सिंह, संगीता बलवंत आणि संजय सेठ आहे. तर समाजवादी पक्षाने जया बच्चन, आलोक रंजन आणि रामजी लाल सुमन यांना मैदानात उतरवले आहे.


कर्नाटक - कर्नाटकात एकूण ५ उमेदवार आहेत. काँग्रेसकडून अजय माकन, सय्यद नासीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर मैदानात आहेत. भाजपकडून नारायण सा भांडले तर जेडीएसे कुपेंद्र रेड्डी यांना उतरवले आहे.


हिमाचल प्रदेश - येथे एकूण २ उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेसने अभिषेक मनु सिंघवी यांना उमेदवार केले आहे तर भाजपकडून हर्ष महाजन रिंगणात आहेत.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या