टी-२० आंतरराष्ट्रीयमधील सर्वात वेगवान शतक, इतक्या बॉलमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड

  95

मुंबई: टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सगळ्यात वेगवान शतकाचा जुना रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. आता नवा रेकॉर्ड २२ वर्षीय नामिबियाचा फलंदाज जॉन निकोल लॉफ्टी इटनच्या नावावर झाला आहे. आपल्या १०१ धावांच्या खेळीदरम्यान जॉन लॉफ्टीने ३६ बॉलचा सामना केला. यात त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले.

जॉन निकोल लॉफ्टी इटनने केवळ ३३ बॉलमध्ये रेकॉर्ड आपल्या नावावर केला. ३३ बॉलमध्ये टी-२० शतक ठोकताच नेपाळच्या कुशल मल्लाचा मागील रेकॉर्ड उद्ध्वस्त केला. खास बाब म्हणजे निकोलने नेपाळी संघाविरुद्ध हा मोठा रेकॉर्ड केला.

 



नेपाल ट्राय नेशन टी-२० आंतरराष्ट्रीय सीरिजअंतर्गत नामिबिया आणि नेपाळ यांच्यात हा टी-२० सामना आज २७ फेब्रुवारीला कीर्तीपूरमधील त्रिभुवन युनिर्व्हसिटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात खेळवण्यात आले. जॉन लॉफ्टी इटनच्या शतकाच्या जोरावर नामिबियाने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत ४ बाद २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेपाळच्या संघाला हार पत्करावी लागली.

जेव्हा हा रेकॉर्ड लॉफ्टी इटनने तोडला तेव्हा कुशल मल्लाही मैदानात होता. कुशलने २०२३मध्ये आशियाई गेम्समध्ये मंगोलियाविरुद्ध ३४ बॉलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकले होते.
Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी