टी-२० आंतरराष्ट्रीयमधील सर्वात वेगवान शतक, इतक्या बॉलमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड

मुंबई: टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सगळ्यात वेगवान शतकाचा जुना रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. आता नवा रेकॉर्ड २२ वर्षीय नामिबियाचा फलंदाज जॉन निकोल लॉफ्टी इटनच्या नावावर झाला आहे. आपल्या १०१ धावांच्या खेळीदरम्यान जॉन लॉफ्टीने ३६ बॉलचा सामना केला. यात त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले.

जॉन निकोल लॉफ्टी इटनने केवळ ३३ बॉलमध्ये रेकॉर्ड आपल्या नावावर केला. ३३ बॉलमध्ये टी-२० शतक ठोकताच नेपाळच्या कुशल मल्लाचा मागील रेकॉर्ड उद्ध्वस्त केला. खास बाब म्हणजे निकोलने नेपाळी संघाविरुद्ध हा मोठा रेकॉर्ड केला.

 



नेपाल ट्राय नेशन टी-२० आंतरराष्ट्रीय सीरिजअंतर्गत नामिबिया आणि नेपाळ यांच्यात हा टी-२० सामना आज २७ फेब्रुवारीला कीर्तीपूरमधील त्रिभुवन युनिर्व्हसिटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात खेळवण्यात आले. जॉन लॉफ्टी इटनच्या शतकाच्या जोरावर नामिबियाने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत ४ बाद २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेपाळच्या संघाला हार पत्करावी लागली.

जेव्हा हा रेकॉर्ड लॉफ्टी इटनने तोडला तेव्हा कुशल मल्लाही मैदानात होता. कुशलने २०२३मध्ये आशियाई गेम्समध्ये मंगोलियाविरुद्ध ३४ बॉलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकले होते.
Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या