टी-२० आंतरराष्ट्रीयमधील सर्वात वेगवान शतक, इतक्या बॉलमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड

  99

मुंबई: टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सगळ्यात वेगवान शतकाचा जुना रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. आता नवा रेकॉर्ड २२ वर्षीय नामिबियाचा फलंदाज जॉन निकोल लॉफ्टी इटनच्या नावावर झाला आहे. आपल्या १०१ धावांच्या खेळीदरम्यान जॉन लॉफ्टीने ३६ बॉलचा सामना केला. यात त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले.

जॉन निकोल लॉफ्टी इटनने केवळ ३३ बॉलमध्ये रेकॉर्ड आपल्या नावावर केला. ३३ बॉलमध्ये टी-२० शतक ठोकताच नेपाळच्या कुशल मल्लाचा मागील रेकॉर्ड उद्ध्वस्त केला. खास बाब म्हणजे निकोलने नेपाळी संघाविरुद्ध हा मोठा रेकॉर्ड केला.

 



नेपाल ट्राय नेशन टी-२० आंतरराष्ट्रीय सीरिजअंतर्गत नामिबिया आणि नेपाळ यांच्यात हा टी-२० सामना आज २७ फेब्रुवारीला कीर्तीपूरमधील त्रिभुवन युनिर्व्हसिटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात खेळवण्यात आले. जॉन लॉफ्टी इटनच्या शतकाच्या जोरावर नामिबियाने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत ४ बाद २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेपाळच्या संघाला हार पत्करावी लागली.

जेव्हा हा रेकॉर्ड लॉफ्टी इटनने तोडला तेव्हा कुशल मल्लाही मैदानात होता. कुशलने २०२३मध्ये आशियाई गेम्समध्ये मंगोलियाविरुद्ध ३४ बॉलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकले होते.
Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र