Bihar Accident : पंचायत फेम अभिनेत्री आँचल तिवारीसह ९ भोजपुरी कलाकारांचा अपघातात मृत्यू

  318

बिहारमधील भीषण अपघात


पाटणा : बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास बिहारच्या कैमूर जिल्ह्यात ट्रक, एसयूव्ही आणि मोटारसायकल यांची टक्कर होऊन भीषण अपघात (Bihar Accident) झाला. या अपघातात पंचायत (Panchayat) फेम अभिनेत्री आँचल तिवारीसह (Anchal Tiwari) काही प्रसिद्ध भोजपुरी कलाकारांचा (Bhojpuri Artists) मृत्यू झाला आहे. या कलाकारांच्या मृत्यूनंतर भोजपूरी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिलांसह आठ लोक एका एसयूव्ही गाडीमधून प्रवास करत होते. यावेळी या गाडीला एक दुचाकी धडकली. यानंतर,एसयूव्ही आणि दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये गेले, तेथे एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकीच्या चालकासह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.


या घटनेनंतर त्या मार्गावर ट्रॅफिक जाम झाले. ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी भभुवा येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.


विमलेश पांडे उर्फ छोटू पांडे या भोजपुरी गायकाचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यासह आँचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम, दधिबल सिंह, अनु पांडे, शशि पांडे, सत्य प्रकाश मिश्रा आणि बागीश पांडे यांचा या अपघातात मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.



Comments
Add Comment

जळालेले मालवाहक जहाज टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले

कोची : सिंगापूरचा झेंडा लावलेले एमव्ही वान है ५०३ हे जहाज भारताच्या तटरक्षक दलाने टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले.

दिल्ली: जनपथ रोडवरील सीसीएस इमारतीला आग

नवी दिल्ली : जनपथ रोडवरील सीसीएस इमारतीत आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तेरा गाड्या

सांगलीत ड्रगचा कारखाना चालवणाऱ्याला UAE मध्ये पकडले, भारतात आणले

नवी दिल्ली : भारतामध्ये महाराष्ट्रात सांगली येथे सिंथेटिक ड्रग तयार करण्याचा कारखाना चालवणारा ताहेर सलीम डोला

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत थोडक्यात बचावली अकोल्याची ऐश्वर्या

अकोला: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत 240 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हे विमान एका वैद्यकीय

Ahmedabad plane crash : विमान अपघातात आतापर्यंत २७० मृतदेह आढळले, ७ जणांची ओळख पटवण्यात यश

अहमदाबाद : एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर आज, शुक्रवारी घटनास्थळाहून आतापर्यंत २७० जणांचे मृतदेह आढळून आलेत.

AI 171 Crash नंतर डीजीसीएचा मोठा निर्णय, एअर इंडियाच्या सर्व बोईंग ड्रीमलाइनर विमानांची कडक सुरक्षा तपासणी होणार

अहमदाबाद मध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमान AI171 च्या भयानक अपघातानंतर डीजीसीए (DGCA) द्वारे एक मोठा निर्णय