Bihar Accident : पंचायत फेम अभिनेत्री आँचल तिवारीसह ९ भोजपुरी कलाकारांचा अपघातात मृत्यू

बिहारमधील भीषण अपघात


पाटणा : बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास बिहारच्या कैमूर जिल्ह्यात ट्रक, एसयूव्ही आणि मोटारसायकल यांची टक्कर होऊन भीषण अपघात (Bihar Accident) झाला. या अपघातात पंचायत (Panchayat) फेम अभिनेत्री आँचल तिवारीसह (Anchal Tiwari) काही प्रसिद्ध भोजपुरी कलाकारांचा (Bhojpuri Artists) मृत्यू झाला आहे. या कलाकारांच्या मृत्यूनंतर भोजपूरी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिलांसह आठ लोक एका एसयूव्ही गाडीमधून प्रवास करत होते. यावेळी या गाडीला एक दुचाकी धडकली. यानंतर,एसयूव्ही आणि दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये गेले, तेथे एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकीच्या चालकासह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.


या घटनेनंतर त्या मार्गावर ट्रॅफिक जाम झाले. ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी भभुवा येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.


विमलेश पांडे उर्फ छोटू पांडे या भोजपुरी गायकाचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यासह आँचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम, दधिबल सिंह, अनु पांडे, शशि पांडे, सत्य प्रकाश मिश्रा आणि बागीश पांडे यांचा या अपघातात मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.



Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला