IND vs Eng: ७६ धावांची ती भागीदारी...ज्याने बदलला रांची कसोटीचा डाव

रांची: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये सुरू आहे. सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९२ धावांचे आव्हान मिळाले आहे. याचा पाठलाग करताना भारताने तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत बिनबाद ४० धावा केल्या आहेत. भारताचे सलामीवीर यशस्वी जायसवाल १६ आणि कर्णधार रोहित शर्मा २४ धावांवर नाबाद आहेत. आज भारतासाठी विजयासाठी १५२ धावा हव्या आहेत तर त्यांच्याकडे १० विकेट बाकी आहेत.



या भागीदारीने बदलला गेम


भारतीय संघाने या कसोटी सामन्यात ज्या पद्धतीने पुनरागमन केले आहे ते कौतुकास्पद आहे. या पुनरागमनामध्ये ७६ धावांची भागीदारी महत्त्वाची आहे. ही भागीदारी पहिल्या डावात कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांच्यात आठव्या विकेटसाठी झाली होती. जर ही भागीदारी झाली नसती तर इंग्लंडला पहिल्या डावात सव्वाशेपेक्षा जास्त धावांची आघाडी मिळाली असती. कुलदीप-जुरेल यांच्या भागीदारीमुळे भारताला ३०० धावांचा आकडा पार करण्यात यश मिळाले आणि इंग्लंडला केवळ ४६ धावांची आघाडी मिळाली.


कुलदीप यादव मूळत: गोलंदाज आहे. मात्र रांचीच्या कठीण पिचवर त्याने हार मानली नाही आणि डटून इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला. कुलदीपने दोन चौकारांच्या मदतीने १३१ बॉलमध्ये २८ धावा केल्या. कुलदीपने पहिल्यांदा कसोटीमध्ये एवढे बॉल खेळले. याआधी डिसेंबर २०२२मध्ये कुलदीपने बांगलादेशविरुद्ध ११४ बॉलमध्ये ४० धावांची खेळी ेली होती.


दुसरीकडे विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल केवळ दुसरा सामना खेळत होता मात्र त्याची बॅटिंग पाहून अनुभवी फलंदाज खेळत असल्याची जाणीव होत होती. जुरैलने सुरवातीला सांभाळत बॅटिंग केली मात्र जम बसल्यावर त्याने जोरदार प्रहार केले. जुरेलने १४९ बॉलचा सामना करताना ९० धावा केल्या.

Comments
Add Comment

IND vs SL: आशिया कपमध्ये पहिल्यांदा धावसंख्या २०० पार, भारताचे श्रीलंकेसमोर विजयासाठी इतके मोठे आव्हान

दुबई: आशिया कप २०२५मधील १८व्या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २०३ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले आहे.

ICCने सूर्यकुमार यादवला ठरवले दोषी, ठोठावला दंड, निर्णयाला BCCI ने दिले आव्हान

दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांनंतर वाद सुरूच आहे. या मालिकेतील भारत आणि

IND vs PAK: आम्ही टीम इंडियालाही हरवू शकतो...बांगलादेशला हरवल्यानंतर पाकच्या कर्णधाराने दिले चॅलेंज

दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला आहे. बांगलादेशचा ११

Asis Cup 2025: आशिया कपच्या ४१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे हे...भारताविरुद्ध खेळणार हा संघ

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील निर्णायक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव करत अंतिम

बिग बॅश लीगमध्ये रविचंद्रन अश्विन सिडनी थंडरकडून खेळणार

कॅनबेरा : अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन बिग बॅश लीगच्या आगामी हंगामासाठी सिडनी थंडरकडून खेळणार आहे. या

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर