IND vs Eng: ७६ धावांची ती भागीदारी...ज्याने बदलला रांची कसोटीचा डाव

रांची: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये सुरू आहे. सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९२ धावांचे आव्हान मिळाले आहे. याचा पाठलाग करताना भारताने तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत बिनबाद ४० धावा केल्या आहेत. भारताचे सलामीवीर यशस्वी जायसवाल १६ आणि कर्णधार रोहित शर्मा २४ धावांवर नाबाद आहेत. आज भारतासाठी विजयासाठी १५२ धावा हव्या आहेत तर त्यांच्याकडे १० विकेट बाकी आहेत.



या भागीदारीने बदलला गेम


भारतीय संघाने या कसोटी सामन्यात ज्या पद्धतीने पुनरागमन केले आहे ते कौतुकास्पद आहे. या पुनरागमनामध्ये ७६ धावांची भागीदारी महत्त्वाची आहे. ही भागीदारी पहिल्या डावात कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांच्यात आठव्या विकेटसाठी झाली होती. जर ही भागीदारी झाली नसती तर इंग्लंडला पहिल्या डावात सव्वाशेपेक्षा जास्त धावांची आघाडी मिळाली असती. कुलदीप-जुरेल यांच्या भागीदारीमुळे भारताला ३०० धावांचा आकडा पार करण्यात यश मिळाले आणि इंग्लंडला केवळ ४६ धावांची आघाडी मिळाली.


कुलदीप यादव मूळत: गोलंदाज आहे. मात्र रांचीच्या कठीण पिचवर त्याने हार मानली नाही आणि डटून इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला. कुलदीपने दोन चौकारांच्या मदतीने १३१ बॉलमध्ये २८ धावा केल्या. कुलदीपने पहिल्यांदा कसोटीमध्ये एवढे बॉल खेळले. याआधी डिसेंबर २०२२मध्ये कुलदीपने बांगलादेशविरुद्ध ११४ बॉलमध्ये ४० धावांची खेळी ेली होती.


दुसरीकडे विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल केवळ दुसरा सामना खेळत होता मात्र त्याची बॅटिंग पाहून अनुभवी फलंदाज खेळत असल्याची जाणीव होत होती. जुरैलने सुरवातीला सांभाळत बॅटिंग केली मात्र जम बसल्यावर त्याने जोरदार प्रहार केले. जुरेलने १४९ बॉलचा सामना करताना ९० धावा केल्या.

Comments
Add Comment

न्यूझीलंडचा ५० धावांनी विजय

शिवम दुबेची तुफानी खेळी व्यर्थ शाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) चे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली आणि दुःखद

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली