IND vs ENG: पदार्पणाच्या कसोटीत चमकला आकाशदीप, ज्यो रूटने वाढवल्या टीम इंडियाच्या अडचणी

रांची: रांची कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या ७ बाद ३०२ इतकी झाली. ज्यो रूट १०६ धावा करून नॉटआऊट परतला. तर ओली रॉबिन्सन ३१ धावांवर नाबाद आहे. याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लडचा सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्राऊलीने पहिल्या विकेटसाठी ४७ धावा केल्या.



ज्यो रूटने ठोकले शतक, मात्र फलंदाजांनी केली निराशा


इंग्लंडचे टॉप ३ फलंदाज ५७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर जॉनी बेअरस्ट्रॉने काही चांगले शॉट लगावले. माज्ञ रवी अश्विनच्या बॉलवर बाद झाला. इंग्लंडचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. मात्र दुसरीकडे ज्यो रूटने एक बाजू लावून धरली. ज्यो रूटने बेन फोक्सशिवाय खालच्या फळीतील फलंदाजांना हाताशी घेत संघाला सन्मानजनक धावसंख्येवर आणून ठेवले.


इंग्लंडसाठी सलामीवीर जॅक क्राऊलीने ४२ धावा केल्या. तर बेन डकेट ११ धावा करून बाद झाला. ओली पोप आपले खातेही खोलू शकला नाही. जॉनी बेअरस्ट्रॉने ३८ धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्स ३ धावा करून बाद झाला.



आकाशदीपने आपल्या डेब्यू टेस्टमध्ये केला जलवा


भारतीय गोलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास आकाशदीपने आपल्या कसोटी पदार्पणात शानदार गोलंदाजी केली. आकाश दीपने इंग्लंडच्या टॉप ३ फलंदाजांना आपली शिकार बनवले. मोहम्मद सिराजला २ बळी मिळवता आले. रवी अश्विन आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकाला एक-एक यश मिळाले.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत