महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. हिंदुजा रुग्णालयात त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गुरूवारी रात्रीच्या वेळेस त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू तसेच महाराष्ट्रातील बिगर काँग्रेसी पहिले मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणापासून दूर होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासादरम्यान अनेक महत्त्वाची पदे भूषवली.

अशी झाली राजकीय कारकीर्द सुरू


सुरूवातीला शिवसेनेकडून ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यांनी शिवसेनेकडून मुंबईचे महापौरपदही भू।वले. १९९५मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती.

मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेजजवळच्या W54 या त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत ठेवले जाणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दादरच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
Comments
Add Comment

Watermelon Case : कलिंगड खाऊन मृत्यू की प्लॅन केलेला कट? पायधुनीतील 'त्या' ४ मृत्यूंमागे ७ वर्ष जुनं रहस्य!

मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या पायधुनी परिसरातील घाटी गल्लीत एका घटनेने सर्वांचीच झोप उडवली आहे. येथील 'मुघल

Watercut In Mumbai : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे आणि तुर्भेपर्यंतचा जलबोगदा होणार सुरु

येत्या ५ ते ६ मे रोजी ३० तासांची जोडणी कामांसाठी पाणीकपात मुंबई : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे व तुर्भे

1 May Maharashtra Day : १ मे : दादर-शिवाजी पार्क परिसराच्या वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पर्यायी मार्ग!

मुंबई : उद्या, शुक्रवार १ मे रोजी 'महाराष्ट्र दिनानिमित्त' दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर राज्य

मोठी बातमी: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, महत्त्वाचे कारण समोर

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरदार रंगात असताना मोठी बातमी समोर आली आहे.

Bacchu Kadu, Nilam Gorhe : अखेर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार झाले जाहीर; शिवसेनेच्या या नेत्यांना मिळणार उमेदवारी

मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच या निवडणुकीसाठी बच्चू कडू यांचा पक्ष

BMC News : विरोधकांचा होता निर्धार पक्का, सत्ताधाऱ्यांना बसला धक्का

-वडाळ्यातील गृहनिर्माण संस्थेच्या प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी विरोधकांनी हाणून पाडली मुंबई (विशेष