चारही विधीमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेला ‘आमदार’

  44

मनोहर जोशींनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली


नवी दिल्ली : मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झाले. ते एक दिग्गज नेते होते, ज्यांनी लोकसेवेत अनेक वर्षे घालवली. महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी जोशींसोबतची आठवण एक्स पोस्ट करत शेअर केली आहे.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात आपल्या संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. मनोहर जोशी जी चारही विधीमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेले आमदार म्हणून त्यांच्या मेहनतीबद्दलही स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांप्रती संवेदना. ओम शांती, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली आहे.

Comments
Add Comment

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.