Shiv Thakare : बिग बॉस फेम शिव ठाकरेला ईडीची नोटीस; काय आहे प्रकरण?

Share

मुंबई : आपल्या हटके स्टाईल अन् स्वॅगसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि बिग बॉस (Bigg Boss) व खतरों के खिलाडी (Khatron ke Khiladi) या रिअॅलिटी शोजमधून (Reality Shows) प्रसिद्धी मिळालेल्या शिव ठाकरेला (Shiv Thakare) आगामी काळात मोठ्या अडचणीला सामोरं जावे लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचं कारण त्याला पाठविण्यात आलेलं ईडीचं समन्स.

मनीलॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात शिव ठाकरेला ईडीकडून नोटीस (ED Notice) पाठवण्यात आली आहे. त्याच्यासह अब्दू रोझिकचंही (Abdu Rozhik) नाव त्या यादीत असल्याचं समोर आलं आहे.

हे प्रकरण सध्या जेलमध्ये असणाऱ्या ड्रग माफिया अली असगर शिराजीशी (Ali Asgar Shiraji) संबंधित आहे. त्यावरुन अब्दू आणि शिवला नोटीस पाठविण्यात आली असून त्यांची चौकशीही झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये शिव आणि अब्दूची कोणतीही महत्वाची भूमिका नाही. त्यांना केवळ हायप्रोफाईल मनी लॉड्रिंग केस असल्याने चौकशी आणि साक्षीसाठी बोलविण्यात आले होते. त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

10 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

10 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

11 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

12 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

12 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

13 hours ago