Bhool Bhulaiyaa 3 : 'भुलभुलैया ३' मध्ये दिसणार नाही कियारा! 'या' अभिनेत्रीला मिळाली संधी

नायिकेचा चेहरा दिसताच चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'भुलभुलैया ३' (Bhool Bhulaiyaa 3) या सिनेमाची चर्चा आहे. 'भुलभुलैया २' मध्ये न दिसलेली विद्या बालन (Vidya Balan) तिसर्‍या भागात दिसणार आहे. मात्र, दुसर्‍या भागात मुख्य नायिका म्हणून दिसलेली कियारा अडवाणी (Kiara Advani) 'भुलभुलैया ३' मध्ये दिसणार नाही, अशी चर्चा होती. ही चर्चा आता खरी ठरली आहे. कारण 'भुलभुलैया ३' मधून कियाराचा पत्ता कट झाला आहे. तिच्याऐवजी रातोरात प्रसिद्ध झालेल्या एका अभिनेत्रीला संधी मिळाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आहे.


'भुलभुलैया २' मध्ये मुख्य भूमिकेत झळकलेला कार्तिक आर्यन (Kartik Aryan) तिसर्‍या भागातही झळकणार आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका पोस्टरवर नायिकेचे केवळ हसू दिसेल अशा प्रकारचा फोटो शेअर केला होता. त्याने प्रेक्षकांना ती कोण असेल हे ओळखायला सांगितले होते. अनेकांनी तिला ओळखलेही व तेव्हाच कियाराचा पत्ता कट झाल्याचा प्रेक्षकांना अंदाज आला. यानंतर कार्तिकने पुन्हा एकदा अभिनेत्रीचे डोळे व नंतर संपूर्ण फोटो शेअर करत ती अभिनेत्री तृप्ती डिमरी असल्याचे जाहीर केले. यानंतर कार्तिकच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.





अनेकजण 'भुलभुलैया ३' मधील तृप्तीच्या एंट्रीमुळे खूश झाले आहेत. तर कियाराला बाजूला केल्यामुळे कियाराच्या अनेक चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. असं असलं तरी कार्तिक आणि तृप्तीची केमिस्ट्री पडद्यावर चांगली दिसणार का? 'भुलभुलैया ३' देखील हिट ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या