Bhool Bhulaiyaa 3 : 'भुलभुलैया ३' मध्ये दिसणार नाही कियारा! 'या' अभिनेत्रीला मिळाली संधी

नायिकेचा चेहरा दिसताच चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'भुलभुलैया ३' (Bhool Bhulaiyaa 3) या सिनेमाची चर्चा आहे. 'भुलभुलैया २' मध्ये न दिसलेली विद्या बालन (Vidya Balan) तिसर्‍या भागात दिसणार आहे. मात्र, दुसर्‍या भागात मुख्य नायिका म्हणून दिसलेली कियारा अडवाणी (Kiara Advani) 'भुलभुलैया ३' मध्ये दिसणार नाही, अशी चर्चा होती. ही चर्चा आता खरी ठरली आहे. कारण 'भुलभुलैया ३' मधून कियाराचा पत्ता कट झाला आहे. तिच्याऐवजी रातोरात प्रसिद्ध झालेल्या एका अभिनेत्रीला संधी मिळाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आहे.


'भुलभुलैया २' मध्ये मुख्य भूमिकेत झळकलेला कार्तिक आर्यन (Kartik Aryan) तिसर्‍या भागातही झळकणार आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका पोस्टरवर नायिकेचे केवळ हसू दिसेल अशा प्रकारचा फोटो शेअर केला होता. त्याने प्रेक्षकांना ती कोण असेल हे ओळखायला सांगितले होते. अनेकांनी तिला ओळखलेही व तेव्हाच कियाराचा पत्ता कट झाल्याचा प्रेक्षकांना अंदाज आला. यानंतर कार्तिकने पुन्हा एकदा अभिनेत्रीचे डोळे व नंतर संपूर्ण फोटो शेअर करत ती अभिनेत्री तृप्ती डिमरी असल्याचे जाहीर केले. यानंतर कार्तिकच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.





अनेकजण 'भुलभुलैया ३' मधील तृप्तीच्या एंट्रीमुळे खूश झाले आहेत. तर कियाराला बाजूला केल्यामुळे कियाराच्या अनेक चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. असं असलं तरी कार्तिक आणि तृप्तीची केमिस्ट्री पडद्यावर चांगली दिसणार का? 'भुलभुलैया ३' देखील हिट ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील