बिहारमध्ये भीषण रस्ते अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू

Share

पाटणा: बिहारच्या(bihar) लखीसराय येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे घडलेल्या भीषण रस्ते अपघातात(road accident) ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रामगढचौक ठाणे क्षेत्रातील बिहरौरा गावातील घटना. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार टक्कर दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की ऑटोचा चक्काचूर झाला.

येथे १५ लोक ऑटोमून जात होते. त्याचवेळेस अज्ञात वाहनाने या ऑटोला टक्कर दिली. या घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ७ जण जखमी झाले. आसपासच्या लोकांनी ही सूटना पोलिसांना दिली.

या घटनेची सूचना आजूबाजूच्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आली आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले. जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे. मृत तसेच जखमी व्यक्तींची ओळख पटलेली नाही.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

1 hour ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

1 hour ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

2 hours ago