बिहारमध्ये भीषण रस्ते अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू

पाटणा: बिहारच्या(bihar) लखीसराय येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे घडलेल्या भीषण रस्ते अपघातात(road accident) ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रामगढचौक ठाणे क्षेत्रातील बिहरौरा गावातील घटना. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार टक्कर दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की ऑटोचा चक्काचूर झाला.


येथे १५ लोक ऑटोमून जात होते. त्याचवेळेस अज्ञात वाहनाने या ऑटोला टक्कर दिली. या घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ७ जण जखमी झाले. आसपासच्या लोकांनी ही सूटना पोलिसांना दिली.


या घटनेची सूचना आजूबाजूच्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आली आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले. जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे. मृत तसेच जखमी व्यक्तींची ओळख पटलेली नाही.

Comments
Add Comment

ट्रम्प यांना पुन्हा आली भारताची आठवण, म्हणाले मोदी माझे चांगले मित्र

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणाले की त्यांना पूर्ण विश्वास आहे की

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

२०४० मध्ये चंद्रावर भारतीय पाऊल पडणार

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४,

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव