पाटणा: बिहारच्या(bihar) लखीसराय येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे घडलेल्या भीषण रस्ते अपघातात(road accident) ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रामगढचौक ठाणे क्षेत्रातील बिहरौरा गावातील घटना. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार टक्कर दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की ऑटोचा चक्काचूर झाला.
येथे १५ लोक ऑटोमून जात होते. त्याचवेळेस अज्ञात वाहनाने या ऑटोला टक्कर दिली. या घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ७ जण जखमी झाले. आसपासच्या लोकांनी ही सूटना पोलिसांना दिली.
या घटनेची सूचना आजूबाजूच्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आली आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले. जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे. मृत तसेच जखमी व्यक्तींची ओळख पटलेली नाही.
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…