भारताच्या या ५ क्रिकेटर्सनी एकाच वेळी केली निवृत्तीची घोषणा

  86

मुंबई: भारताचे हे ५ क्रिकेटर आता खेळाच्या मैदानावर खेळताना दिसणार नाहीत. या पाच खेळाडूंनी रणजी हंगामाच्या २०२३-३४च्या समापनासह क्रिकेटलाही अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्रिकेटर आहेत मनोज तिवारी, वरूण एरॉन, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी आणि फैज फजल. या खेळाडूंनी केवळ भारतासाठीच कोणत्या ना कोणत्या फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे तर डोमेस्टिक स्तरावरही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.


बंगालचा दिग्गज मनोज तिवारी, झारंखडचा फलंदाज सौरभ तिवारी आणि वेगवान गोलंदाज वरूण एरॉन, मुंबईचा धवल कुलकर्णी आणि विदर्भचा फैज फजल, यांनी निवृत्ती घेण्याची वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. यात आयीएलसोबतचा करार नसणे तसेच राष्ट्रीय संघात जागा मिळण्याची आशा संपणे अशी आहेत.


वरूण एरॉन, मनोज तिवारी आणि फैज फजल यांनी त्याच मैदानावर अलविदा म्हटले जिथे त्यांनी आपल्या प्रवासाची सुरूवात केली होती ३८ वर्षीय मनोज तिवारीने सोमवारी बिहारविरुद्ध आपल्या संघाला विजय मिळवून देत अलविदा म्हटले. मनोज तिवारीने भारतासाठी १२ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.


वेगवान गोलंदाज वरूण एरॉन तसेच सौरभ तिवारीयांनीही निवृत्तीची घोषणा केली आहे. सौरभ १७ वर्षे झारखंड संघाकडून खेळत आहे. त्याने भारतासाठी ३ वनडे सामने खेळले आहेत. तर वरूण एरॉन सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्यामुळे तो चांगली कामगिरी करू शकत नाही. त्याने भारतासाठी ९ कसोटी आणि तितकेच वनडे सामने खेळलेत. फैज फजल विदर्भकडून खेळला आहे. त्याच्या नेतृत्वात विदर्भने २०१८मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. भारताकडून त्याने २०१६मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध केवळ एक वनडे सामना खेळला होता.


भारतासाठी १२ वनडे आणि २ टी-२० सामने खेळणारा धवल कुलकर्णीला आपल्या स्विंग मूव्हमेंट, तसेच जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखले जाते. मुंबईच्या या खेळाडूने १७ वर्षे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला