Hair Fall: तुमचे केस खूप गळतायत? गंभीर आजाराचे लक्षण तर नाही ना..

मुंबई: आजकालच्या खराब लाईफस्टाईलमुळे केसांचे गळणे(hair fall) ही सामान्य गोष्ट बनली आहे. कमी वयातच अनेकांचे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. आरोग्य तज्ञांच्या मते वय वाढण्यासोबतच केसांची लांबी तसेच प्रमाण कमी होऊ लागते. केसांचे गळहे हे वय वाढणे, जेनेटिक आणि हार्मोन्समधील बदलामुळे होऊ शकते मात्र त्रास तेव्हा वाढतो जेव्हा कमी वयात केस वेगाने गळू लागतात.


अशातच काही योग्य उपाय करून ही केसगळती रोखता येऊ शकते. अधिकतर केस गळणे ही स्काल्पची समस्या असू शकते. मात्र अनेकदा इतर कारणेही असतात.



केस तुटणे


तज्ञांच्या मते फिजीकल आणि मेंटल दोन्ही प्रकारचे आजार केसांच्या गळतीचे कारण बनू शकतात. ल्यूपस, सिफलिस, थायरॉईड, सेक्स हार्मोनमधील असंतुलन अथवा पोषणसंबंधी समस्येमुळे केस वेगाने गळतात. याशिवाय प्रोटीन, आर्यन, झिंक यांच्या कमतरतेमुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.



तणावामुळे केस गळतात


अधिक तणाव अथवा डिप्रेशन असल्यासही केसांची समस्या उद्भवते. अशा लोकांमध्ये केस गळतीचे प्रमाण अधिक असते. जेव्हा आपण ताण घेतो तेव्हा स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल रिलीज होते. हे केसांच्या विकासासाठी गरजेच्या पेशींना नुकसान पोहोचवते. यामुळे केस कमकुवत होतात तसेच तुटण्याचा धोकाही वाढतो.



थायरॉईडमुळे गळू शकतात केस


ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांचेही केस गळू शकतात. हायपर अथवा हायपोथायरॉईडिज्म या दोन्ही स्थिती केस गळण्याची समस्या होते.



पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे गळतात केस


केसांचे आरोग्य टिकवण्यासाठी पोषकतत्वांची आवश्यकता असते. रायबोफ्लेविन, बायोटिन, फोलेट आणि व्हिटामिन बी१२ आणि व्हिटामिन ई केस गळती रोखू शकतात. जेवणात झिंक प्रोटीनसारखी पोषकत्वांची कमतरता असल्यास केस गळतात.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण