अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांच्यासह जेपी नड्डांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

  167

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा, एनसीपीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे या ६ जणांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.


आज अर्थात मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत या ६ जागांवर नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र या कालावधीत ना कुठले नवे नामांकन आले ना कुणी आपले नाव मागे घेतले. यामुळे या ६ खासदारांची नावे राज्यसभेसाठी बिनविरोध पक्की झाली आहेत. यात भारतीय जनता पक्षाच्या तीन, तर शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एक-एक नेत्याचा समावेश आहे.


गुजरातमधून जे पी नड्डा राज्यसभेवर


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची गुजरातमधून राज्यसभेसाठी निवड झाली आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपमध्ये गुजरातचे महत्व पूर्वीच्या तुलनेत खूप अधिक वाढताना दिसत आहे.


राजस्थानातून सोनिया गांधी यांची बिनविरोध निवड


काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची राजस्थानातून राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय, भाजपचे चुन्नीलाल गरासिया आणि मदन राठोड यांचीही राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. महत्वाचे म्हणजे, उच्च सभागृहात बसण्याची सोनिया गांधी यांची पहिलीच वेळ असणार आहे.


मध्य प्रदेशातून या नेत्यांची निवड


मध्य प्रदेशातून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यात भाजपचे एल मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नारोलिया, बंसीलाल गुर्जर, तर काँग्रेसचे अशोक सिंह यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके