Shivjayanti : शिवनेरी गडावर शिवजयंती सोहळ्याचा मोठा उत्साह, शिवभक्तांची मोठी गर्दी

मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचे दैवत मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९४वी जयंती आहे. राज्यभरात शिवजयंतीनिमित्त विविध सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावरही शिवजयंती सोहळ्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे.


शिवजयंतीचा सोहळा शिवनेरी गडावर पार पडत आहे. यासाठी शिवभक्तांनी या गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्रीही या शिवजन्मसोहळ्यात सहभागी होणार आहेत.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे. या ठिकाणी सोहळ्यानिमित्त गडावर रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी शिवाई देवीची शासकीय महापूजा आयुक्त कुलकुलवार आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत झाली.


शिवनेरी गडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवाई देवराई आणि वन उ्द्योगाचे लोकार्पण होणार आहे. तसेच गडाच्या पायथ्याशी शिवभक्तांसाठी टूव्हीलर आणि चारचाकी गाड्यांसाठी पार्किंग एरिया वाढवण्यात आला आहे.


Comments
Add Comment

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ