मुंबई : मागील काही महिन्यांपासून भाजपा (BJP) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर अनेक रणनिती आखताना दिसत आहे. काँग्रेस (Congress) पक्षातले अनेक बडे बडे नेते भाजपमध्ये समाविष्ट झाल्याने काँग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यातच आता मनसेही (MNS) भाजपच्या गळाला लागणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये शिवतीर्थावर (Shivtirth) जवळपास एक तास चर्चा झाली. यामुळे भाजप आणि मनसेमध्ये युती (MNS BJP Alliance) होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होण्याच्या चर्चा सुरु आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच मनसेचे तीन प्रमुख नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडली होती. त्यात आज पुन्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाल्याने नेमकी काय उलथापालथ होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना दिल्लीतून बोलावलं जाण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून राज ठाकरे यांना दिल्ली दरबारी बोलवणं येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसोबत चर्चा करून भाजप त्यांना सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेऊ शकते, असंही बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात भाजप-मनसे युतीबाबत बोलताना स्पष्ट म्हटलं होतं की, याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होईल. फडणवीसांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चांना होकार किंवा नकार देणं टाळलं होतं, यावेळी त्यांनी स्पष्ट बोलणं टाळलं होतं. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीची चर्चा कायम आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…