MNS BJP Alliance : राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात शिवतीर्थावर तब्बल एक तास चर्चा

हे मनसे-भाजप युतीचे संकेत?


मुंबई : मागील काही महिन्यांपासून भाजपा (BJP) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर अनेक रणनिती आखताना दिसत आहे. काँग्रेस (Congress) पक्षातले अनेक बडे बडे नेते भाजपमध्ये समाविष्ट झाल्याने काँग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यातच आता मनसेही (MNS) भाजपच्या गळाला लागणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये शिवतीर्थावर (Shivtirth) जवळपास एक तास चर्चा झाली. यामुळे भाजप आणि मनसेमध्ये युती (MNS BJP Alliance) होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होण्याच्या चर्चा सुरु आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच मनसेचे तीन प्रमुख नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडली होती. त्यात आज पुन्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाल्याने नेमकी काय उलथापालथ होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



राज ठाकरेंना येणार दिल्लीतून बोलावणं?


महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना दिल्लीतून बोलावलं जाण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून राज ठाकरे यांना दिल्ली दरबारी बोलवणं येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसोबत चर्चा करून भाजप त्यांना सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेऊ शकते, असंही बोललं जात आहे.



देवेंद्र फडणवीसांनीही दिले होते युतीचे संकेत


काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात भाजप-मनसे युतीबाबत बोलताना स्पष्ट म्हटलं होतं की, याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होईल. फडणवीसांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चांना होकार किंवा नकार देणं टाळलं होतं, यावेळी त्यांनी स्पष्ट बोलणं टाळलं होतं. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीची चर्चा कायम आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील