MNS BJP Alliance : राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात शिवतीर्थावर तब्बल एक तास चर्चा

हे मनसे-भाजप युतीचे संकेत?


मुंबई : मागील काही महिन्यांपासून भाजपा (BJP) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर अनेक रणनिती आखताना दिसत आहे. काँग्रेस (Congress) पक्षातले अनेक बडे बडे नेते भाजपमध्ये समाविष्ट झाल्याने काँग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यातच आता मनसेही (MNS) भाजपच्या गळाला लागणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये शिवतीर्थावर (Shivtirth) जवळपास एक तास चर्चा झाली. यामुळे भाजप आणि मनसेमध्ये युती (MNS BJP Alliance) होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होण्याच्या चर्चा सुरु आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच मनसेचे तीन प्रमुख नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडली होती. त्यात आज पुन्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाल्याने नेमकी काय उलथापालथ होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



राज ठाकरेंना येणार दिल्लीतून बोलावणं?


महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना दिल्लीतून बोलावलं जाण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून राज ठाकरे यांना दिल्ली दरबारी बोलवणं येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसोबत चर्चा करून भाजप त्यांना सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेऊ शकते, असंही बोललं जात आहे.



देवेंद्र फडणवीसांनीही दिले होते युतीचे संकेत


काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात भाजप-मनसे युतीबाबत बोलताना स्पष्ट म्हटलं होतं की, याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होईल. फडणवीसांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चांना होकार किंवा नकार देणं टाळलं होतं, यावेळी त्यांनी स्पष्ट बोलणं टाळलं होतं. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीची चर्चा कायम आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या