MNS BJP Alliance : राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात शिवतीर्थावर तब्बल एक तास चर्चा

Share

हे मनसे-भाजप युतीचे संकेत?

मुंबई : मागील काही महिन्यांपासून भाजपा (BJP) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर अनेक रणनिती आखताना दिसत आहे. काँग्रेस (Congress) पक्षातले अनेक बडे बडे नेते भाजपमध्ये समाविष्ट झाल्याने काँग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यातच आता मनसेही (MNS) भाजपच्या गळाला लागणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये शिवतीर्थावर (Shivtirth) जवळपास एक तास चर्चा झाली. यामुळे भाजप आणि मनसेमध्ये युती (MNS BJP Alliance) होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होण्याच्या चर्चा सुरु आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच मनसेचे तीन प्रमुख नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडली होती. त्यात आज पुन्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाल्याने नेमकी काय उलथापालथ होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरेंना येणार दिल्लीतून बोलावणं?

महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना दिल्लीतून बोलावलं जाण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून राज ठाकरे यांना दिल्ली दरबारी बोलवणं येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसोबत चर्चा करून भाजप त्यांना सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेऊ शकते, असंही बोललं जात आहे.

देवेंद्र फडणवीसांनीही दिले होते युतीचे संकेत

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात भाजप-मनसे युतीबाबत बोलताना स्पष्ट म्हटलं होतं की, याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होईल. फडणवीसांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चांना होकार किंवा नकार देणं टाळलं होतं, यावेळी त्यांनी स्पष्ट बोलणं टाळलं होतं. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीची चर्चा कायम आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Recent Posts

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

27 mins ago

प्रहार बुलेटीन: ०५ जुलै २०२४

दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…

2 hours ago

Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…

2 hours ago

NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…

4 hours ago

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…

4 hours ago

Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…

5 hours ago